जनतेसाठी झटणारा एकमात्र नेता : अजय कंकडालवार

0
569

जनतेसाठी झटणारा एकमात्र नेता : अजय कंकडालवार

गडचिरोली, सूखसागर झाडे :– अहेरी तालुक्यातील इंदाराम या छोटयाश्या गावातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करून सामान्य कार्यकर्ता, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीचे संचालक ते जिल्हापरिषदेचे अध्यक्ष पदापर्यंत मारलेली मजल ही अजय कंकडालवार यांची ओळख आहे .
अजय कंकडालवार यांनी लाॅकडाऊन काळात अनेकांना मदतीचा हात पुरवला, निवडणुका असो किंवा नसो नेहमी नागरिकांशी संपर्कात असलेला, तत्पर, कार्यक्षम म्हणून अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्यांनी लाॅकडाऊन काळात दुसऱ्या राज्यात गेलेल्या मजुरांना आपल्या राज्यात येण्याची सोय करून सोबतच त्यांचा निवासाची, भोजनाची सोय करून दिली. एवढेच नाही तर अनेकांना मदतीचा हात देवून आर्थीक मदत पोहचवली.
जिल्हयातील इतर नेते, लोकप्रतिनिधी हे निवडणुकापुरताच काम करतात, निवडून आले तर आपली खुर्ची गरम करण्याचेचे काम करत असतात व लोकांच्या समस्या जाणुन घेण्याचे काम करीत नाही , तर काहींना निवडणुका जिंकता आली नाही की पाच वर्षे नागरिकांच्या संपर्कात राहत नाही समस्या जाणून घेत नाही व पुर्णतः अज्ञानवासात राहातात व पुन्हा निवडणुका तोंडाजवळ येताच जनतेच्या सामोर येवून आपली वाहवाह जनतेत करीत असतात याला अपवाद म्हणून अजय कंकडालवार आहेत. हे निवडणुका जवळ आले आणि निवडुन आले म्हणूनच नाही तर निवडणुका असो अथवा नसो सदैव जनतेशी एकनिष्ठ व संपर्कात असलेला नेता म्हणून ओळख आहे. जिल्हयातील प्रत्येक निकडणुकीत त्यांचा सक्रीय सहभाग असतोच त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रमाला आदराने दिलेल्या आमंत्रणाला स्विकारून कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवित असतात. जिल्हयातील दुर्गम भागात मेळाव्याचे आयोजन करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, तसेच परिसरातील संपुर्ण बाबींचा आढावा घेऊन समस्या दुर करून तेथील जनतेशी त्यांच्या भाषेतच संवाद साधून समस्या सोडविणे, अपघात ग्रस्तांना आर्थीक मदत पुरविणे, मृतकाच्या घरी सांत्वना भेट देवून आर्थीक मदत करणे, कार्यकर्त्यांशी कोणताही दुजाभाव न करता मनमोकळेपणाने संवाद साधने, नागरिकांच्या समस्या परस्पर जाणून घेणारा एकमेव नेता म्हणूनही त्यांच्याकडे बघीतले जाते.
अजय कंकडलवार हा एकमेव जिल्हयातील सक्रीय नेता आहे जेे नागरिकांच्या समस्या परस्पर जावून सोडवित असतो. यांनी जिल्हयातील दुर्गम अतिदुर्गम भागाचे दौरे करून नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्यांचे निराकारण करुन जिल्हाचा सर्वांगीण विकास साधण्याचा अथांग प्रयत्न करणारा जनसामान्यांचा नेता म्हणून ओळखले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here