भारतरत्न महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा पुरोगामी विचार मंच राजुराच्या वतीने नोंदविण्यात आला निषेध…

0
22

भारतरत्न महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा पुरोगामी विचार मंच राजुराच्या वतीने नोंदविण्यात आला निषेध…

राजुरा : निवडणुकीच्या काळात महात्मा फुले चौक, यवतमाळ येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा अज्ञात समाजकंटकांनी प्रयत्न केला. समाजकंटकाचा शिव-फुले-शाहू- आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जाहिर निषेध करून समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर शासन करण्याची मागणी तहसीलदारान मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना केली.आजही महात्मा फुलेंच्या विचारसरणीला समोर येऊन भिडण्याची ताकत समाजकंटकात नाही,म्हणून या देशाची अस्मिता असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करून समाजातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केला जातो. पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे.वेळीच अशा समाज विघातक लोकांवर आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे राजुरा येथील किसान वॉर्डातील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास हार घालून त्यानंतर तहसील कार्यालयात आरोपींना तातळीने अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा महारष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुरोगामी विचार मंच राजुराच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी बापूराव मडावी, दिनेश पारखी, आसिफ सय्यद, अमोल राऊत, एजाज अहमद, नंदकिशोर वाढई, पुंडलिक वाढई, दत्तू गुरनुले, ज्योती शेंडे, संगीता मोहूर्ले, धनराज उमरे, संघपाल देठे, स्वप्नील मोहुरले, उमेश गोरे, आक्रोश जुलमे रोहित माथनकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here