२७ सप्टेंबर च्या ‘भारत बंद’ साठी अत्यंत महत्त्वापूर्ण तयारीचा बैठकीचे अयोजन

0
516

२७ सप्टेंबर च्या ‘भारत बंद’ साठी अत्यंत महत्त्वापूर्ण तयारीचा बैठकीचे अयोजन

वणी (यवतमाळ), मनोज नवले

संयुक्त किसान मोर्चाने आपल्या राष्ट्रीय संमेलनात, मोदी सरकारच्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या व भारतीय संविधानिक मूल्यांशी विसंगत असलेल्या धोरणांविरुद्ध २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. ५ सप्टेंबरला उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगरला झालेल्या १० लाखांच्या अभूतपूर्व किसान मजदूर महापंचायतीने या हाकेस बुलंद समर्थन दिले आहे.

 

देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, शेतमजूर, महिला, युवा, विद्यार्थी व इतर संघटनांनी या ‘भारत बंद’ ला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

 

महाराष्ट्रात हा ‘भारत बंद’ प्रचंड प्रमाणात यशस्वी करण्यासाठी भाजपच्या विरोधात असलेले सर्व राजकीय पक्ष, शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, महिला, युवा, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक इत्यादी घटकांच्या संघटना तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती यांची अत्यंत महत्त्वाची बैठक रविवार दि. आज दुपारी 1 वाजता वसंत जिनिंग वणी येथे आयोजित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here