तेली समाजाचे एकत्रीकरण हि काळाची गरज – महाराष्ट्र प्रांतिक महासभा कोषाध्यक्ष गजानन शेलार यांचे प्रतिपादन
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज रथ यात्रा व समाज जोडो तथा ओबीसी जागरण अभियान
गडचिरोली, सुखसागर झाडे
तेली समाज हा संख्येने मोठा आहे त्या साठी तेली समाज बांधव सुद्धा मोठा झाला पाहिजे. श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या दर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण तेली समाज बांधवाचे दर्शन होत असते. तेली समाजाला जोडायाचे असेल तर तेली सामाजाचे एकत्रीकरण महत्वाचे आहे. राजकारणामध्ये तेली समाजाने तेली समाजालाच पाठींबा दिला पाहिजे, तेव्हाच राजकारणात तेली समाज मोठा होवू शकतो. आजही संपूर्ण तेली समाज बांधवांचे एकत्रीकरण होणे हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन महराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोशाध्यक्ष मा. गजानन शेलार यांनी केले.
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची रथ यात्रा हि संत जगनाडे महाराज यांचा जन्मगाव सौदुंबर येथून निघालेली असुन आज गडचिरोली येथे रथ यात्रेचे आगमन झाले. आठवडी बाजारातील हनुमान मंदिर येथे श्री संत जगनाडे महाराज यांच्या चरनपादुकांचे पूजन करून शहरातील मुख्य बाजार मार्गाने रथ यात्रा काढून इंदिरा गांधी चौकातील राजीव भवन येथे समारोप करण्यात आले. यावेळी तेली समाज बांधवांना प्रबोधान्त्मक मार्गदर्शन करतांना गजाननजी शेलार बोलत होते.
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या रथ यात्रेचे व चरण पादुकांचे शहरातील तसेच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील हजोरो तेली समाज बांधवांनी दर्शन घेतले.
विदर्भामध्ये एकूण ८० लक्ष तेली समाज आहे.समाजाचा विकास हाच तेली समाज बांधवांनी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. एक तेली सामाज म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाने तेली समाजाची किंमत केली पाहिजेतेली समाज बांधवांनी एकमेकांसाठी तेली समाजाची ताकत उभी केली पाहिजे.
केन्द्र व राज्य सरकारकडे ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी घेवुन जाणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे महासचिव भुषणजी कर्डिले यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
यावेळी प्रांतिक तैलिक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा समन्वयक सुनील चौधरी, समन्वयक नरेन्द्र चौधरी, युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष जगदीश वैध्य, नागपूर जिल्हाध्यक्ष दिनेश तिमांडे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष (उत्तर) प्रमोद पिपरे, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रभाकर वासेकर, विदर्भ तेली समाज जिल्हाध्यक्ष सुरेश भांडेकर, उपाध्यक्ष गोपिनाथ चांदेवार, नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नप सभापती मुक्तेश्वर काटवे, शंकर नैताम, भैयाजी सोमनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शीलात सोमनकर, सचिव रोशनी राखडे, उपाध्यक्ष ऐश्वर्या लाकडे, कार्याध्यक्ष अश्विनी भरडकर, नगरसेविका वैष्णवी नैताम, सामाजिक कार्यकर्ते विलास नैताम तसेच जिल्यातील मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मा. रमेश भुरसे यांनी केले तर आभार संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष देवानंदजी कांबडी यांनी मानले.