वणी शहरातून भरदिवसा जड वाहतूक….      पोलीस अधीक्षकांचे वाहतूक विभागाकडे दुर्लक्ष ?

0
565

वणी शहरातून भरदिवसा जड वाहतूक….

     पोलीस अधीक्षकांचे वाहतूक विभागाकडे दुर्लक्ष ?

वणी:- मनोज नवले शहरात उपजिल्हा वाहतूक शाखा ही शहरातील वाहतूक व्यवस्था उत्तम ठेवण्यासाठी आहे. मात्र वाहतूक पोलीस शहरातील वाहतूक व्यवस्था कशी राहील याकडे जास्त लक्ष देताना दिसत नाही.

शहरातील वाहतुक सामान्य माणसाला खूपच डोकेदुखी ठरत आहे. वणीच्या टिळक चौक, डॉ आंबेडकर चौक, गांधी चौक, सरोदय चौक येथे नेहमी वाहतूक ठप्प राहते. तसेच जड वाहनांना सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत शहरात जाण्यास बंदी आहे. तसेच जड वाहने टोल वाचवण्यासाठी पोलिसांच्या समोरून शहरातून जात असतात, मात्र सामान्य जनतेवर दंड ठोकून अस्तित्वाचा दिंडोरा पिटणारी वाहतूक शाखा या ओव्हरलोड वाहतुकीबाबत मुंग गिळून गप्प का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

वाहतूक पोलिसांचा ताफा नेहमी टिळक चौकात असतो, पोलीस कारवाईही करत असतात मात्र दोन चाकी वाहनावर. टिळक चौक व शिवाजी महाराज चौकात तर आटोवाले नेहमी वाहतूक कोंडी करतात. मात्र वाहतूक पोलीस फक्त बघ्यांची भूमिका घेत असतात. वाहतूक पोलिस हे चारचाकी, तीनचाकी, मोठ्या जड वाहनावर कारवाई करण्याची प्रकरणे कमी असून त्यांची हिम्मत फक्त गरीब सामान्य जनता, शेतकरी या दुचाकी धारकांवर करत असल्याने हा अन्याय किती दिवस जनतेने सहन करावा असा प्रश्न नागरिक करत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ भुजबळ पाटील यांचे वणी वाहतूक पोलिसांवर काहीच नियंत्रण दिसत नाही. त्यांनी जनतेची हाक ऐकावी असे नागरिकांना वाटते. पोलीस अधीक्षक यांना कदाचित वणी किती बहुगुणी आहे याबद्दल माहिती नसावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here