वृक्षसंवर्धन हीच आजची खरी गरज – डॉ. उमेश तुळसकर

0
459

वृक्षसंवर्धन हीच आजची खरी गरज – डॉ. उमेश तुळसकर

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षारोपण आयोजन

तालुका प्रतिनिधी -हिंगणघाट-अनंता वायसे

मातोश्री आशाताई कुणावार, कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे दिनांक ०७/०८/२०२१ रोज शनिवारला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून प्रा डॉ नयना शिरभाते, उपप्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपुर यांची उपस्थिती होती, प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अभय दांडेकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा सपना जयस्वाल यांची उपस्थिती होती, प्रसंगी अतिथी प्रा डॉ नयना शिरभाते यांनी वृक्षाचे महत्त्व विशद केले तर अध्यक्षीय मनोगतातून डॉ उमेश तुळसकर यांनी वाढत्या व बदलत्या तापमानामुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून संरक्षण करायचे असेल तर वृक्षारोपण व संवर्धन हीच आजची खरी गरज आहे असे प्रतिपादन केले.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अजय बीरे यांनी तर प्रास्ताविक प्रा अभय दांडेकर व आभार प्रा. मोनाली गिरडे यांनी मानले.
कार्यक्रमाला कला वाणिज्य व विज्ञान विभागाचे सर्व प्राध्यापक- प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तीनही विभागाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here