Impact 24 news
चंद्रपूर/राजुरा :- ग्रामपंचायत बामनवाडा येथील प्रभाग क्र. १ मधील श्रीमती. बयानाबई पर्शिकर आणि श्रीमती कल्पना ताई भोयर यांच्या घरावरून mseb ची जुन्या विद्युत तारा जाते. गेल्या कित्येक वर्षा अगोदर या तारांचा वापर होत होता. परंतु नवीन तारा टाकल्याने वर्तमान काळात त्या ज्युण्या तारांचा काही उपयोग नाही आहे. त्या जिवंत तारा इतक्या खाली पर्यंत लोंबत आहे. जणू लोकांचा हात पोहाचनार इतक्या खाली पर्यंत आल्या आहेत. पावसाळी काळात त्या जिवंत तारा वराधुर आल्यामुळे झाडांना,इतर वस्तूंना चीपकतात आणि त्यातून तिडक्या निघतात. अश्या जिवंत तरामुडे तेथील नागरिकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेत बिरसा क्रांती दल चे जिल्हा युवा अध्यक्ष तथा ग्राम. इलेक्शन मधले प्रतिस्पर्धी मा. अभिलाष परचाके यांनी घेतली. त्या तारा ग्राम. सरपंच श्रीमती भारती जगदीश पाल यांच्या निदर्शनास आणून दिले व सरपंच मॅडम ने स्वतः तिथे जाऊन त्या तारांची पाहणी तथा चौकशी केली,आणि लवकरात लवकर त्या जिवंत, लोकांना धोकादायक विद्युत तारा निष्कामी करण्यात येईल असे आश्वासन दिले.