अकोला शहरातील गरीबांना प्रहार संघटनेकडून अन्नदान ! शुभांगी पाटीलचा पुढाकार ! 

0
507

Impact 24 news

विशेष प्रतिनिधी ✍🏻किरण घाटे

 

जगभरासह राज्यात काेराेना विषाणुचा प्रादुर्भाव झालेला आहे .त्याची झळ अकाेला जिल्ह्यालाही पाेहचली असल्याचे प्रत्यक्षात दिसुन येते .लाँकडाऊनच्या परिस्थितीत मजूर वर्गांच्या हाताला काम नाही .त्यांचे समाेर दाेन वेळच्या भाेजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे .कठीण परिस्थितीत ते दिवस काढीत आहे हे सत्य नाकारता येत नाही .अश्या कठीण समयी सामाजिक बांधिलकीचे नाते जपतं गुरुवार दि. ३जून ला शुभांगी पाटील- इंगोले या अकाेल्याच्या प्रहार रूग्ण सेविकाने आपले पिताश्री रमेश का.पाटील (गांधीग्राम) यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त राज्यमंत्री तथा अकाेला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन शहरातील विविध भागातील बे सहारा व गरीबांना अन्नदान केले.

याच दिनी रात्री ८:३० वाजता शुभांगी पाटील यांनी आपल्या सहकार्या सोबत अकोला शहरातील सिंधी कॅम्प, अशोक वाटीका,शितला माता मंदिर, शनि मंदिर , गांधी रोड परीसर इत्यादी भागात जाऊन गरजूंच्या व्यथा ऐकत त्यांना अन्नदान केले . या उपक्रमात त्यांना श्याम खंडारे, प्रकाश इंगळे यांचे देखिल माेलाचे सहकार्य मिळाले .शुभांगी पाटील या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहतात हे विशेष !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here