महाविकास आघाडीला जागे करण्यासाठी भव्य शेतकरी आंदोलन
अनंता वायसे
हिंगणघाट । आज दिनांक ०९-११-२०२० ला वर्धा येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ महा विकास आघाडीला जागे करण्यासाठी भव्य शेतकरी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये ● वर्धा जिल्ह्यात नापिकीमुळे पिकाची आणेवारी 50 टक्के च्या आत करावी.
● सोयाबीन नापिकी नुकसान भरपाई तात्काळ करावी.
● कापूस बोंड अळी व बोंड सड नुकसान भरपाई तत्काळ मिळावी.
● शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे वीजबिल माफ करावी. या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या प्रमुख मागण्या धरून भव्य शेतकरी आंदोलन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये मा. खासदार रामदाजी तडस, मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार, मा. आ. पंकजभाऊ भोयर, मा. आ. दादारावजी केचे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सरिकाताई घागरे इत्यादी सर्व वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य तसेच असंख्य शेतकरी बांधव सदर धरणे आंदोलनाला उपस्थित होते.