स्टुडंट्स फोरम गृप कोरपना द्वारा आयोजित आदर्श गाव पाटोदा संरपच भास्कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन

0
588

स्टुडंट्स फोरम गृप कोरपना द्वारा आयोजित आदर्श गाव पाटोदा संरपच भास्कर पेरे पाटील यांचे मार्गदर्शन

 

 

कोरपना/प्रतिनिधी : ग्रामविकासाठी पंचसूत्री संकल्पना प्रभावी माध्यम असून, सरपंच व गावकऱ्यांनी एकमेकांना समजावून घेतल्यास गावचा सर्वांगीण होण्यास कुणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे-पाटील यांनी केले आहे. कोरपना येथे स्टुडंट्स फोरम गृप च्या वतीने नुकताच पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

 

या वेळी मंचावर माजी आमदार सुदर्शन निमकर,माजी आमदार संजय धोटे,देवराव भोंगळे, आबीद अली, नारायण हिवरकर,अरुण डोहे, विशाल गज्जलवार, पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे, अमोल आसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पेरे-पाटील यांनी शुद्ध पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि गावातील निराधार आणि वयस्कर नागरिकांचे पालनपोषण करावे. त्याचबरोबर ग्रामविकासासाठी सरपंच व गावकरी यांच्यातील परस्पर संबंध महत्वाचे असून, विकासाच्या प्रक्रियेत दोघांच्याही भूमिकाचे महत्त्व विषद केले. ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सुरळीत करभरणा केल्यास गावच्या विकास प्रक्रियेत सरकारी निधी आणि करातील पैसे असे दुप्पटीने अर्थसहाय्य प्राप्त होऊन गावचा कायापालट होईल, असे सांगितले.

 

तसेच स्टुडन्ट फोरम ग्रुप तर्फे डॉक्टर प्रवीण येरमे डॉक्टर शारदा प्रवीण येरमे कोरपना रत्न पुरस्कार व आदर्श शिक्षक परतेकी सर व समाजसेवक दिनेश राठोड जीवन “गौरव पुरस्कार” देण्यात आला , यावेळी प्रास्ताविकात अनिल देरकर यांनी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर सुत्रसंचलन अविनाश पोईनकर यांनी केले.

 

तसेच स्टुडंट्स फोरम गृप कोरपनाच्या वतीने विविध क्षेत्रांतील उत्कृष्ठ कार्य करणार्‍या व्यक्तींना पेरे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here