दालमिया सिमेंट कंपनिसमोर मनसेचे आंदोलन कायम

0
486

दालमिया सिमेंट कंपनिसमोर मनसेचे आंदोलन कायम

१३ दिवसाअखेर आठ जणांचे अन्न त्याग उपोषण सूर

कामगारांना न्याय मिळाल्या शिवाय शांत बसणार नाही – सचिन भोयर यांची पत्रकार परिषदेत माहिती

नारंडा : नितेश शेंडे
मागील तेरा दिवसापासून कोरपना तालुक्यातील नारांडा फाटा येथे स्थित असलेल्या भारत दालमिया सिमेंट कारखान्यासमोर कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिपत्याखाली धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलना संबंधी शासनाकडून रीतसर परवानगी घेऊन स्थानिक तालुका प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन निवेदन देत संबंधित सर्व मंत्री व प्रशासकीय अधिकारी यांना प्रतीलीपी पाठवण्यात आल्या. मात्र आठ दिवसाचा कालावधी लोटूनही कोणत्याही प्रकारचे निराकरण न झाल्याने शेवटी कामगार वर्गाच्या माध्यमातून आमरण उपोषणाची वाच्यता करण्यात आली. पूर्वाश्रमीची मुरली सिमेंट कंपनी डबघाईला आल्यानंतर त्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांच्या व्यथा न्यायालयाच्या दालनात पोहोचल्या. याच कालावधीत भारत दालमिया ग्रुपने कंपनी टेक ओव्हर केल्याने कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या. न्यायालयाने सुद्धा कामगाराच्या बाजूनेच निर्णय देत, सर्वांना आशेचा एक किरण दाखवला. कंपनीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला. तरी सुद्धा कामगार मात्र अन्यायग्रस्त राहिले. अनेकांचे रोजगार गेले, जमिनी गेल्या आता पोट भरायचे कसे ? हा यक्षप्रश्न कामगारांत पुढे उभा टाकल्यामुळे कामगारांनी कामगार सेनेचा पाठिंबा घेत आंदोलनाला सुरुवात केली.

सतत तेरा दिवस धरणे आंदोलन चालवत सुद्धा तालुका प्रशासनाने कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून काहीच हालचाली न झाल्यामुळे शिवाय पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलन मोडीत काढण्यासाठी झालेले विविध प्रयत्न कामगारांना दिल्या गेलेल्या धमक्‍या यामुळे सर्व कामगारांनी कुटुंबासमवेत आमरण उपोषणाची तयारी दर्शवित. आज पासून जुन्या आठ कंत्राटी कामगारांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून आतातरी कंपनी व्यवस्थापनाला जाग येईल काय? न्यायालयाच्या माध्यमातून कंपनीला सुरुवात होताच या ठिकाणी पूर्वाश्रमीचे जे कामगार काम करीत होते त्यांना आगीदर घेतलेबजाईल. त्यांचे थकित वेतन टप्प्याटप्प्याने दिले जाईल. त्यांच्या जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत त्यांना रोजगार मिळेल. कंपनीच्या विविध सोयी सुविधा कामगारांना लागू राहील असा निकाल असताना सुद्धा भारत दालमिया कंपनीच्या माध्यमातून आस्थापने मध्ये काम करण्यासाठी परराज्यातून कामगारांचा भरणा केला जात आहे. दुसऱ्या जिल्ह्यातुन कामगार या ठिकाणी येऊ लागले असून पूर्वी काम करत असलेला कामगार मात्र कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलनच करीत आहेत. आंदोलकांच्या मागण्यावर आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी जिल्हाभरातील नेत्यांनी या ठिकाणी कामगार संघ स्थापन केले व स्वताची तिजोरी भरून पसार सुद्धा झाले. मात्र कामगार वाऱ्यावरच राहिला. शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील कामगारांना घेऊन आंदोलन सुरू केले. आता याकडे दालमिया व्यवस्थापनाची काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here