दुर्गापूर वायगांव जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतावरील वीज जोडणी तत्काळ करून विद्युत वितरण विषयक समस्या सोडवा अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा
चामोर्शी ✍️ सुखसागर झाडे गडचिरोली
चामोर्शी – येथील आमदार डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात दुर्गापूर वायगांव जिल्हा परिषद क्षेत्राचे नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेट दिली व या भागातील नागरिकांच्या विद्युत वितरण विषयक समस्यांचे निवेदन सादर केले.यावेळी उपस्थितांनी प्रामुख्याने या क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून डिमांड भरूनही शेतकऱ्यांना विद्युत जोडणी करून देण्यात आली नाही तसेच येथील विद्युत वितरण व्यवस्था बरोबर नसल्याने नेहमीच विजेचा लपंडाव सुरू असततो. येथील कनिष्ठ अभियंता उपस्थित राहत नाही. अनेक नागरिकांचे बिल भरूनही माहिती न देता विद्युत वितरण खंडित करण्यात येतात. या भागातील लाईनमॅन बरोबर सेवा देत नाही. नागरिकांना उच्च दाबाचे विद्युत वितरण होत नाही त्यामुळे छोटी मोठी मशिनरी सुयोग्य चालत नाही अशी तक्रार नागरिकांनी केली यावेळी निवेदन देताना येथील भाजपा पदाधिकारी प्रकाश पाटील भोयर महादेव भालावे काशिनाथ राऊतनारायण गद्दे , रविदास चिताळे , विश्वनाथ राऊत , सुरेश परसोडे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले या विषयावर विद्युत वितरण कंपनीने तत्काळ कारवाई न केल्यास चामोर्शी तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे , भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा , ज्येष्ठ नेते जयराम चलाख भाऊ जी पाटील दहेलकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.