घुग्घूस बेलोरा वणी एसटी सूरु करा, नागरिकांची गैरसोय थांबवा : राजु रेड्डी

0
271

घुग्घूस बेलोरा वणी एसटी सूरु करा, नागरिकांची गैरसोय थांबवा : राजु रेड्डी

घुग्गुस : शहरातील नागरिकांना बेलोरा, पुनवट, नायगाव, चारगाव सह अन्य ठिकाणी जाणाऱ्या नागरिलांची प्रचंड गैरसोय होत असल्याने तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी होणाऱ्या गैरसोय थांबविण्यासाठी घुग्गुस बेलोरा मार्गे वणी बस सूरु करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजु रेड्डी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

येथील राजीव रतन रेल्वे सिग्नलवर आर.के . मदानी कंपनीच्या वतीने उड्डाणपूलाचे निर्माण कार्य गेल्या दोन वर्षांपासून कासव गतीने शुरु असून या पुलाला निर्माण करून देण्याची कालावधी केवळ अकरा महिन्याची होती.
मात्र कंपनीच्या ढिसाळ नियोजनाची किंमत शहरातील नागरिक व ग्रामीण क्षेत्रातील नागरिक व शाळेकरी विद्यार्थ्यांना भोगावी लागत आहे.

रेल्वे पुलाच्या निर्माण कार्यामुळे घुग्गुस बेलोरा वणी ही बस बंद करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक मानसिक व शारीरिक कष्ट भोगावे लागत आहे.
सदर रस्त्यावरून प्रवासा करिता खाजगी चारचाकी,दुचाकी व डग्गा ऑटोवर नागरिकांना निर्भर रहावे लागते गरीब नागरिकाकडे स्वतःचे वाहन नाही व ऑटो हे बेहिशेबी रक्कम मांगत असल्याने त्यांचा नाईलाज झाला आहे.
बेलोरा, नायगाव, पुनवट येथील नागरिकांना चंद्रपूर – घुग्गुस येथे येण्यासाठी वरोरा मार्गे फिरत यावे लागते.

ही समस्या लक्षात घेता वणी – घुग्गुस व्हाया बेलोरा केवळ या एस.टी. बसला परवानगी देण्याची मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here