महाराष्ट्रात कापसाचे दर वेगवेगळे आहेत का? शेतकऱ्यांचा सवाल

0
535

 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यात कापूस खरेदी विक्रीचे काम जोरात सुरू आहे. आणि या खरेदी विक्रीत सर्वात जास्त फसवणूक आणि पिळवणूक शेतकऱ्यांचीच होत असून व्यापारी वर्गाला वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे.

कापसाचा भाव प्रतिक्विंटल 8780 रुपये असला तरी अत्यंत अल्प दरात व्यापारी शेतकऱ्यांकडे कापूस खरेदी करत आहे. कसलेही परवाने नसताना उठ सूट व्यापारी तयार झालेले आहेत. या व्यापाऱ्यांचे प्रत्येक गावात दलाल असून त्या दलालांच्या मार्फतीने शेतकऱ्यांना कमी दरात दंडविले जात आहे.

असा प्रकार तालुक्यात व जिल्ह्यात सुरू असला तरी संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here