गायींच्या कळपाने 25 एकरातील पीक केले फस्त

0
557

गायींच्या कळपाने 25 एकरातील पीक केले फस्त

शेतकर्‍यांचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान

 

 

यवतमाळ, मनोज नवले

शेतात गायीचा कळप घुसल्याने अंदाजे 25 एकर शेतातील पिकांचे नुकसान होऊन शेतकर्‍यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. महागाव तालुक्यातील हिवरा ईजनी शिवारातील वसंत चिकराम, अशोक कदम, महेश पानपट्टे, अनंत कदम यांच्या शेतात बारभाई (तांडा) येथील 200 गायीचा कळप घुसल्याने शेतातील उभ्या सोयाबीन, कापूस, तूर पिकांची नासाडी करून पीक खाल्लेे त्यामुळे शेतकर्‍यांचे अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

या सर्व गायी हिवरा येथे कोंडवाड्यात आणल्या असता अपुर्‍या जागेमुळे ही जनावरे कोंडवाड्यात जमा करण्यात आली नाहीत. नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांची अल्प नुकसान भरपाई देण्याची कबुली पशुपालकांनी केल्यावर सर्व गायी पशुपालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here