मोहता मिलच्या कामगारांना न्याय द्या – माजी आमदार प्रा. राजू तिमांडे

0
545

मोहता मिलच्या कामगारांना न्याय द्या – माजी आमदार प्रा. राजू तिमांडे

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे भेट घेउन पत्रा द्वारे केली विनंती

येत्या १५ दिवसाच्या आत मुंबई येथे बैठक बोलवण्याची माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची कामगार मंत्र हसन मुश्रीफ यांना मागणी

हिंगणघाट तालुका प्रतिनिधी-अनंता वायसे

हिंगणघाट येथील जवळपास १२५ वर्षांची परंपरा असलेल्या मोहता इंडस्ट्रीने २२ मे ला टाळेबंदीची नोटीस लावले होते त्यानंतर मिल टाळेबंदी करण्यात आले त्यामुळे कामगार व कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासंबंधी दि ०५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे कामगार मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी भेट घेतली व येत्या 15 दिवसाच्या आत मोहता मिल पूर्ववत सुरू करण्यासंबंधी व्यवस्थापन व अधिकारी यांची मुंबई येथे बैठक बोलावून मोहता मिल पूर्ववत सुरू करून कामगारांना न्याय द्यावे. अशी त्यावेळी विनंती माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री ना.हसन मुश्रीफ यांना केली.

 

अद्याप झालेल्या बैठकीमध्ये मोहता मिल व्यवस्थापनचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही त्यामुळे समोर होणाऱ्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी तसेच एस.पी यांच्यातर्फे आदेश देण्यात यावे की बैठकीला उपस्थित राहिले नाही तर कडक कारवाई करण्यात येईल असे कामगार मंत्र्यांना सांगण्यात आले.

 

हिंगणघाट ही शेतकरी,शेतमजूर, श्रमजीवी कामगारांची नगरी असून तीन पिढ्या पासूनचे कुशल कामगार आहे. गिरणी व्यवस्थापनाच्या मनमर्जी कारभाराने कामगार, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, शासकीय यंत्रणा या सर्वांची दिशाभूल करून टाळेबंदीचा घेतलेला निर्णय येणाऱ्या संकटाची नांदी आहे. मोहता इंडस्ट्रीच्या टाळेबंदीमुळे ५७० कामगारांचे जन जीवन चक्रवहूयात सापडले असून कामगार अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.

 

 

जिल्हाधिकारी वर्धा यांच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यात लॉकडाऊन असल्यामुळे 1 जुन 2021 पर्यंत मोहता मिल इंडस्ट्रीने कंपनी बंद ठेवली होती. या कालावधीत जिल्ह्यातील कार्यरत उद्योगाला या आदेशानुसार सूट देण्यात आली होती. परंतु या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून मोहता इंडस्ट्रीने जाणून- बुजून लॉकडाउनच्या कालखंडात उद्योग बंद ठेवुन ६५० कामगारांचे आर्थिक नुकसान केले आहे. आणि आता दिनांक ०६ जुन २०२१ पासून टाळेबंदीचा नोटीस लावून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

 

 

मोहता इंडस्ट्री हिंगणघाटला 125 वर्षाची जुनी परंपरा असून या ग्रुपने गिमा-टेक्स हिंगणघाट व वणी, पि.व्ही टेक्स्टाईल जाम, आर.एस.आर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स बुरकोणी इत्यादी एक्सपोर्ट कॉलिटीच्या इंडस्ट्रीज परिसरात उभ्या केल्या आहे. मोहता इंडस्ट्रीने 2017 मध्ये कपडा खाता बंद करून कामगारांना व्ही.आर.एस दिला नाही. त्यासंबंधाने नागपूर हायकोर्ट केस चालू आहे तसेच या कामगारांना न्याय देण्यासंबंधी दोन मीटिंग कामगार मंत्रालयात पार पडल्या असुन त्यावर निर्णय झाला नाही.

 

 

मागील दोन वर्षापासून प्रोसेसिंग आणि फोल्डिंग खात्यात बेकायदेशीर लेआॅफ सुरू असून कामगारांना अर्धा पगार सुरू आहे कंपनीच्या अडेलतट्टू धोरणानुसार कामगारांच्या लेआॅफची केस कोर्टात सुरू आहे. मागील 02 वर्षापासून कामगारांना अर्धा पगार सुद्धा वेळेवर मिळत नाही. अशी गंभीर परिस्थिती कामगारांवर आली असून उपासमारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कामगारांच्या परिवाराचे भविष्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे.

 

 

तरी हिंगणघाट येथील कामगार नगरीचे हीच लक्षात घेता मोहता इंडस्ट्री पूर्ववत सुरू करण्यासंबंधी मुंबई येथे बैठक बोलावून मिल पूर्ववत सुरू करण्यात यावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे भेट घेऊन विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here