व्हाट्सएपवर ‘बाय-बाय’ चं स्टेट्सस टाकून त्याने संपवली “जीवनयात्रा”

0
484

व्हाट्सएपवर ‘बाय-बाय’ चं स्टेट्सस टाकून त्याने संपवली “जीवनयात्रा”

खडसंगी येथील युवा व्यावसायिकाची आत्महत्या

चिमूर (चंद्रपूर), आशिष गजभिये

रोजच्या दिनचर्येसारखा तो सकाळीच उठला दूध घायला गेला नित्यनियमाने सर्वाशी बोलला…सतत मोबाइल वाजत असल्याने शेजाऱ्याने दरवाजा डोकावून बघितलं तर गळफास घेतल्या अवस्थेत एकच गर्दी झाली मित्रपरिवार च्या लक्षात आले अवघ्या काही वेळा आधीच व्हाट्सएपला बाय-बाय असं स्टेटस टाकून त्याने जगाचा निरोप घेतला आहे.

ही गोष्ट आहे तालुक्यातील खडसंगी येथील, संदीप चौधरी(२५) नामक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृतक मागील चार वर्षांपासून खडसंगी येथे व्यावसायाचा निमित्ताने वास्तव्यास होता.

मूळचा राजस्थान येथील असळलेला युवक संदीप चौधरी (वय 25) हा बसस्टॉप जवळील बंटी जयस्वाल यांच्या चाळीमध्ये स्विट मार्ट चे दुकान अनेक दिवसांपासून चालवित होता. गोड स्वभावाने गावातील अनेक मुलांशी मैत्रीचे नाते जोडले होते. मनमिळावू त्याचा स्वभाव असल्याने कमी वेळात लवकर मैत्री जुळवीत होता. संदीप हा भाडेतत्त्वावर खोलीत एकटाच राहत होता. मागील पंधरा दिवसा आधीच 2 जुलैला संदीप चा वाढदिवस होता. नागरिकांच्या चर्चेनुसार त्याचा वाढदिवस त्याच्या मित्रांनी साजरा केला होता. तर त्याचे लग्न सुद्धा त्याच्याच गावाकडील एका मुलीशी जुडला असून, सगाई झाली असल्याची माहिती आहे. लग्नाची तारीख निघालेली असल्याने, मुलीकडील मंडळींनी ते लग्नाची तारीख समोर ढकल्याची माहिती आहे. यामुळं गावातील नागरिकांना वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला असून, लग्न तुटलं तर नसेल म्हणून तर आत्महत्या केली नसावी ना..! अश्या गावात आता चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र व्हाट्सएपला बाय-बाय स्टेटस टाकून जीवनयात्रा संपवली असल्याची सद्या चर्चा सुरु आहे.

यावेळी चिमूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहड, सोनुने, चांदेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शव उत्तरीय तपासणीसाठी नेले, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण उघडकीस येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here