चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

0
784

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

सहा महिन्यांची मुलगी अनाथ

चिमूर तालुक्यातील मासळ येथील घटना

आशिष गजभिये
चिमूर (चंद्रपूर)

प्रेमप्रकरणातून विवाहित झालेल्या एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लाठीने जबरमारहान करीत
हत्या केल्याची घटना काल मंगळवारला रात्री 11 वाजताच्या दरम्यान मासळ (बु) बेघर वस्ती येथे घडली यामुळे त्याची सहा महिन्यांची मुलगी अनाथ झाली असून मृतकाचे नाव विशाखा दीक्षित पाटील वय 32 तर हत्यारा पती दीक्षित हरिदास पाटील
वय 38 आहे प्राप्त माहितीनुसार घटनेतील आरोपीचा मागील वर्षी तिसरा विवाह मृत्यूक विशाखा सोबत बोद्ध विहारात झाला होता आरोपीला दारूचे वेसण असून तो पत्नी विशाखाच्या चारित्रावर नेहमी संशय घेत असायचा यातून तो तिला मारहाण करायचा त्यामुळे विवाहाच्या तिसऱ्या महिन्यात च ती माहेराला राहायला गेली नंतर तिने माहेरी या गोंडस मुलीला जन्म दिला आता ती मुलगी सहा महिन्यांची झाली आरोपी दिक्षीत ने नवा जाळ रचत तिला फुसलाऊन परत मासळ येथे आणले होते, मागील तीन महिण्यापासून ती मासळ ला राहत होती मात्र, आरोपीच्या मनात तिच्या चारित्र्या बाबत संशय कायम होतो त्यामुळे तो तिला दररोज मारहाण करीत होता काल घटनेच्या दिवशी त्याने मनसोक्त मद्यप्राशन करून काटा काढण्याचा बेत आखला व मध्यरात्री 11च्या दरम्यान लाठीने डोक्यावर वार करीत तिला यम सदनी धाडले, आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक गोळा झाले तेव्हा तो मृत्यू देहाजवळ जेवण करीत बसला होता, यावरून त्याची क्रूरता लक्षात येते, तूर्तास पोलिसांनी
भा द वि चे कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांचा पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड,राजू गायकवाड, उपनिरीक्षक कांता रेजवाडे, हेडकान्सेटेबल, प्रशांत सूर्यवंशी, विलास निंमगडे,शिपाई सुशील आठवले, मयुरी कोराम, करीत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here