राजूरा चंद्रपूर -किरण घाटे -महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं वरील काव्यकुंजच्या लेखिका तथा मुख्य संयाेजिका सराेज हिवरे यांनी शब्दांकित केलेला घरची लक्ष्मी हा लेख खास वाचकांसाठी देत आहाे !
“घरची लक्ष्मी असते पत्नी
घराचे घरपण असते पत्नी
दिव्यातली वात असते पत्नी
अंगणातील तुळस असते पत्नी ”
पत्नीला कितीही उपमा दया कमीच असते.
तिच्या मुळे घर हसते तिच्यामुळे घर बोलते. तिच्या मुळे घराला घरपण असते
तिच्या मुळेच तर घर सुंदर रंगीं बिरंगी फुलाच्या बगीच्या सारखे दिसते.
पण कित्येक घरी पाहिले तर पत्नीला समजून घेतले जात नाही. पत्नीला मान मिळत नाही. तिला नीट वागणूक देत नाही. पण जरा विचार करून बघा. ती लग्न झाल्यांनतर आपलं माहेर सोडून तुमच्या सोबत सासरी येते. सासरच्या सर्वाना आपलं मानते. ती तर नेहमी साठी आपल्या घरी आलेली असते.तेही आपले आई वडील बहीण भाऊ सर्वांना सोडून. तुम्ही फक्त्त ऐक दिवस घर सोडून बघा तुम्हालाच कळेल काय अवस्था होते तुमची. तुम्ही आपलं घर सोडून गेल्या नंन्तर तुम्हाला दुसरीकडे काहीच करमत नाही. दुसरीकडे सर्व नवीन असते कोणी तुम्हाला ओळखत पण नाही. मग विचार करा तुम्ही एक दिवसासाठी घर सोडून गेले तरी तुमची ही अवस्था होते तर मग तीला कसे वाटत असेल.
आणि हो ती जर चार दिवस आपल्या घरी नसेल तर बघा घराची काय अवस्था होते.आपलं घर अगदी शांत राहील घर बोलणार नाही. आणि साधं एखाद काम जरी करायच म्हंटल तरी ते तुम्हाला जमत नाही.तुमची स्वतः ची वस्तू सुद्धा तुम्हाला मिळत नाही. जे घरचे काम रोजच अगदी व्यवस्थित चाललेलं असते. तुम्हाला तुमच्या सर्व वस्तू वेळेवर तुमच्या हातात मिळते. ते कुणामुळे तर फक्त पत्नीमुळे.
ज्या वेळेला ती तुमचा हात धरून तीच घर सोडून तुमच्या घरी आली या घरची लक्ष्मी झाली. तीन तुमचं घर सहज आपलं म्हणून स्वीकारलं…
यात माहेरच्या आठवणींच किती हुंदक तीनी आवरलं…..
तीनी तिची आवड तिची स्वप्न हे सर्व बाजूला ठेवली. आपल्या पतीच स्वप्न पतीची आवड ती जपत गेली. पण यात
तिचे काही स्वप्न असतील तिच्या काही आवडी असतील हे कधी तिला तुम्ही विचारलं? तिला काय हवं काय नको हे कधी विचारलं?
तिच्या हातचे जेवण रोजच जेवलात एखादा पदार्थ बिघडला तर लगेच नाव ठेवली. पण एखाद्या दिवशी हे तू खूपच छान केले असे कौतुकाचे दोन शब्द कधी तुम्ही बोलले नाही. पण विचार करा हे करत असतांना तिनं किती चटके सोसले असतील.
तिला किती त्रास झाला असेल याचा कधी तुम्ही विचार केला ? नाही ना?
विचार केला नसेल तर विचार करा.
तुम्ही चार पैसे कमावले तिने दोन पैसे वाचविले….
तुमच्या नकळत भविष्यासाठी
तिने ते साठवले…. .
पती घर चालवते,
पत्नी घर सांभाळते….
चालवन्या पेक्षा सांभाळणं कठीण असते…..
तिला जर कुणी म्हंटल मुलं मोठी झाली मार्गी लागली.
ती म्हणते चांगली निघाली वडिलांवर गेली……
वडिलांच्या संस्कारामुळे चांगली वागू लागली…..
पण मुलांना घडवतांना ती किती रात्र जागली….
तिला किती त्रास झाला याचा कधी विचार केला.
अशीच वर्षामागून वर्ष जात आहे. ती मात्र सतत तुमच्या सुखात दुःखात तुमच्या सोबत आहे.
“संसाररुपी सागरात संघर्षाच्या लाटा ll
पतीच्या सुखदुःखात पत्नी चा बरोबरीचा वाटा ll
खरंच आहे ती तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे. तसेच आपला परिवार आपले नातेवाईक म्हणून सर्वांचा सांभाळ करीत आहे.
तसे तुम्हीही तिच्याशी दोन शब्द प्रेमाचे बोला. तिला काय हवं काय नाही याची विचारपूस करत राहा.
आणखी तिला काही नको असते. फक्त दोन शब्द प्रेमाचे…… आणि मग बघा घर कसं आंनदाने भरून जाते. कारण घरातील लक्ष्मी आंनदी तर पूर्ण घर आंनदी
म्हणून या लक्ष्मीला थोडं समजून घ्या तिला प्रेम द्या आणि आंनदाने प्रेमाने संसार करा!