नागरिकांनी कोरोना लस घ्यावी – भूतपूर्व केंद्रीय राज्य मंत्री अहिर 

0
495

चिमूरात पार पडला जीवनाश्यक वस्तु किट वाटपाचा कार्यक्रम 

किरण घाटे /विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर चिमूर : जगासह देशात महाभयानक कोरोना आजार आलेला आहे .बलाढ्य देशात सुद्धा कोरोनाने कहर केला आहे .आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच उपाय योजना करीत जीवीत हानी वाचविण्यासाठी प्रयत्न केले आहे .भविष्यात कोरोना आजार वाढू नये यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करने आवश्यक आहे. आपल्याला पूर्ण आयुष्य जगायचे असेल तर नियमांचे व सुचनांचे काटेकाेरपणे पालन करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कोरोना आजार वाढू नये यासाठी बरेच प्रयत्न केले आहे.

80 कोटी जनतेला धान्य दिलेले असुन सातत्याने उपाय अंमलात आणीत अाहे अश्या ही महामारीत विरोधक मात्र टीका करीत आहे .जगातील 200 देशाना औषाेधाेपचार देत आहोत. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री निवळ भूलथापा देत आहे .राज्यात आम्ही विरोधक असलो तरी सेवा कार्य करीत आहे .जिल्ह्यातील गावात विलगिकरन केंद्र सुरू करण्यासाठी निधी दिला आहे .तेव्हा ग्राम पंचायतनी विलंगिकरण ची तयारी करावी . कोरोना लस घ्यावी आणि कोरोनाला मात करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांनी आज केले आहे..

 

चिमूर तालुक्यातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी व त्यावर मात करण्यासाठी 200 बेड चे गृहविलगिकरण , 50 बेड ऑक्सिजन व आदी उपाय योजना सुरू करण्यात आल्या असून येणाऱ्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे तेव्हा नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहण्याचे सांगत नागरिकांनी कोरोना लस घेण्याचे आवाहन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी या कार्यक्रम निमित्ताने जनतेला केले

 

खासदार अशोक नेते म्हणाले की कोरोना किटाणू संपूर्ण जगात असून दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात पसरला असल्याने प्रमाण वाढलेले आहे पंतप्रधान मोदीनी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्री यांना सूचना करून सावध राहण्याची सूचना केली होती. कोरोना लस बाबत समाजात गैरसमज पसरविल्या जात असून ते चुकीचे आहे तेव्हा कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोना लस घ्यावी असे ते या वेळी म्हणाले.

 

केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या माध्यमातून चिमूर येथील अभ्यंकर मैदान वरील सभागृहात ऑटो चालक मालक, मातंग समाज, नाभिक समाज बांधव यांना जीवनश्यक वस्तू किराणा किटचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी केंद्रीय राज्य मंत्री हंसराजजी अहिर ,खासदार अशोकजी नेते ,आमदार बंटीभाऊ भांगडिया , भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर डॉ. श्यामजी हटवादे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष निलम राचलवार . सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल .भाजप तालुकाध्यक्ष राजु झाडे, महिला तालुकाध्यक्षा मायाताई नन्नावरे, छायाताई कंचर्लावार , निताताई लांडगे भारती गोडे आदीं मान्यवर उपस्थित होते.

 

दरम्यान कोरोना काळात मृत पावलेल्या विषयी मौन श्रद्धाजली अर्पण करण्यात आली .

 

यावेळी नाभिक व्यवसायिक, मातंग समाज, ऑटो चालक मालक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here