नवरात्रोस्तवात वाहतूक विभाग सुन्न…
वाहन चालकांची तारांबळ
राजुरा : सध्या नवरात्र उत्सव सुरू असून शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. मात्र वाहतूक विभाग कर्तव्य बाजूला सारून सुन्न असल्याने राजुरा वाहतूक विभाग चर्चेचा विषय ठरला आहे.
शहरात ठिकठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. शहरातील तसेच सभोवतालच्या ग्रामीण भागातील जनता याठिकाणी आनंद साजरा करण्यासाठी येते. मात्र शहरात वाढती ट्राफिक पाहता वाहतूक शिपाई कोठेच दिसून येत नसल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. वाहन चालविण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे.
उत्सवात वाहतुकीची होणारी कोंडी सोडविण्याचा विसर वाहतूक विभागाला पडल्याचे बोलके चित्र शहरात दिसून येत आहे. यामुळे राजुरा वाहतूक विभाग किती संवेदनशील आहे याचे वास्तव चित्र उत्सवाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहे.