तात्काळ बस सेवा सुरु करा
सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई राठोड यांची विभागीय नियंत्रण अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली मागणी
जिवती / अतिदुर्गम व नक्षलग्रस्त, आदिवासी भाग म्हणून ओळख असलेला जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा नं.1 व भारी बस तात्काळ सुरु करायत यावे.
सध्या शाळा व कॉलेज सुरु झाले आहेत, शेतकरी वर्गाची पण शेती शाळा सुरु झाली आहे शेतीची अवजारे घेण्यासाठी जिवती तालुक्यातील जनतेला गडचांदूर या ठिकाणी जाव लागते पण बस सेवा सुरु नसल्याने जनतेला नहरकत त्रास सहन करावा लागत आहे.
त्याच बरोबर जिवती तालुक्यातील जनतेचे नातेवाईका मराठा या ठिकाणी राहत असल्यामुळे जिवती तालुक्यातील जनतेचे सतत मराठावाड्यात येणे जाणे चालू राहते त्यासाठी लोकल गाड्याने जिवती तालुक्यातील जनतेची मोठी आर्थिक लूट होत असल्यामुळे राजुरा ते अहमदपूर शेणगांव मार्गे रात राणी बस सेवा आठवड्यात दोन ते तिनं वेळा देण्यात यावी अशीही मागणी जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई राठोड यांनी विभागीय नियंत्रण अधिकरी चंद्रपूर यांच्याकडे दि.27 / 6 / 2022 रोजी केली आहे.