पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा एक ही हक्काचा थेंब इतरत्र जाऊ देणार नाही!

0
692

पिंपळगाव खांड धरणातून पाण्याचा एक ही हक्काचा थेंब इतरत्र जाऊ देणार नाही!

सहकार महर्षी, लोकनेते सीताराम पाटील गायकर यांचे प्रतिपादन…..

 

 

अहमदनगर (संगमनेर) १३/६/२०२२
प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गायकर पाटील
पिंपळगाव खांड जलाशयातून कोणती ही पाणीयोजना जाऊ देणार नाही ,असा सूचक इशारा लोकनेते ,अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सहकार महर्षी सिताराम पाटील गायकर यांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अकरा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत ६५ कोटीची पाणी योजना मंजूर झाली असून या योजने साठी पिंपळगाव खांड जलाशयातून पाणी देण्याचे प्रस्तावित निविदा जाहीर झाली आहे. या योजनेची जल विभागाद्वारे निविदा प्रसिद्ध झाली असून योजनेची कार्यवाही सुरू झाली आहे, या पार्श्वभूमीवर मुळा परिसरातील पिंपळगाव खांड धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाणी बचाव कृती समितीने काल रविवार दिनांक १२ जून रोजी पिंपळगाव खांड जलाशयावर मोठे धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, लोकनेते व विद्यमान संचालक सहकार महर्षी, सिताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सकाळी करण्यात आले.

या आंदोलनात कोतुळ परिसरातील बोरी, कोतुळ, वाघापूर, पांगरी, पिंपळगाव खांड, लिंगदेव, चास, पिंपळदरी, कोतूळ, मोग्रस, धामणगाव पाट, लहीत खुर्द व लाहित बुद्रुक परिसरातील, शेतकरी सह आदिवासी भागातील विविध गावातील शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना सहकार महर्षी सिताराम पाटील गायकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत धरणातून थेट पाणी दिले जाणार नाही. पठार भागासाठी पिण्याचे पाणी दिले पाहिजे या भूमिकेसोबत आम्ही आहोत परंतु त्यासाठी पिंपळगाव खांड धरणाचे खालील बाजूस, मुळा नदीत खालच्या बाजूला स्वतंत्र साठवन बंधारा बांधून अगोदर पाणी साठा निर्माण करावा व त्यातून या पाणी योजनेला पाणीपुरवठा करावा याबाबत आमची काही हरकत नाही , परंतु हक्काच्या पिंपळगाव जलाशयातून पाण्याचा फुटबॉल टाकू दिला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. पिंपळगाव धरण हे मुळा विभागाचे संजीवनी असून येथील शेतकरी वर्गास वंचित ठेऊन इतरत्र पाणी देण्यास आमचा विरोध आहे. पिण्याचे पाणी ही काळाची गरज आहे. ज्यांना पाणी द्यायचे आहे ,ते ही आमचेच तहानलेले आहेत. या तहानलेल्या जनतेस योग्य पाणी पुरवठा व्हावा म्हणून आम्ही काही सूचना केल्या आहेत. मुळा नदीत अजून बऱ्याच प्रमाणात काही साईट असून तिथे नव्याने पाण्याचा स्रोत निर्माण करावा व या गावांना कायमचा पाणी प्रश्न सोडवण्यात यावा , या बाबत अजितदादा पवार, जयंत पाटील यांनी प्राथमिक चर्चेत पसंती ही दर्शवली असून , लवकरच या बाबत शेतकऱ्यांचे शिष्ट मंडळ त्यांना पुन्हा भेटणार आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव खांड हे ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधले गेले यातून परिसरातील गावांच्या शेतीचा पाणी प्रश्न सुटला आहे परंतु या धरणातून पाणीयोजना झाल्यास धरणाला आरक्षण लागल्यास परिसरातील शेतकरी कर्जबाजारी होऊन उध्वस्त होईल सहाशे क्षमतेचा साठा हा तितकासा पुरेसा नाही आजही शेतकऱ्यांना एप्रिल-मे मध्ये पाण्याचा तुटवडा भासतो त्यातच पाणी योजना झाल्यास हा साठा अपुरा पडेल म्हणून या धरणातून संगमनेर तालुक्यातील पठारावरील अकरा गावांसाठी थेट पाईप ने पाणीपुरवठा करू देणार नाही नाशिक येथे वरिष्ठ अभियंत्यांची याबाबत चर्चा झाली आहे.

पिंपळगाव खांड धरणाच्या खालील बाजूस मुळा नदीवर काही साइट्स आहे याठिकाणी नवीन साठा बंधारा तयार करून त्यातून या योजनेला पाणीपुरवठा करा करावा मात्र पिंपळगाव खांड च्या धरणात फुटबॉल टाकू दिला जाणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी वाघापूर चे भाऊसाहेब पराते, भाऊसाहेब रक्टे, लिंगदेव चे प्रभाकर फापाळे, भाऊसाहेब हाडवळे, सहदेव चौधरी ,आत्माराम शेटे शिवाजी वाल्हेकर भानुदास डोंगरे, शरद चौधरी ,प्रमोद मंडलिक, अशोकराव देशमुख, मच्छिंद्र धुमाळ महेश नवले, विजय शेटे, सुरेश देशमुख आदी शेतकरी सह परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here