मानीकगड सिमेंट चे पर्यावरण प्रेम उघड?

0
596

मानीकगड सिमेंट चे पर्यावरण प्रेम उघड?

प्रशासनिक अधिकाऱ्याना दाखविले वृक्ष लागवड ; मात्र उभा होत आहे सौर उर्जा प्रकल्प

कोरपना प्रति. : चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित अफलातून कारनाम्यात प्रसिद्ध असलेल्या माणिकगड सिमेंट प्रशासनावर राज्यकर्ते व प्रशासनाचे वचक नसल्याने अलीकडे “हम करेसो कायदा” या जोमाने अनेक अनधिकृत कामे करीत असताना प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत कारभार चालवत असल्यामुळे अनेक तक्रारी करूनही निवड चौकशीचा देखावा केल्या जात आहे. अनेक गंभीर घटना व तक्रारी होऊन सुद्धा प्रशासन योग्य दिशेने कार्यवाही करत नसल्याचे अनेक घटनेवरून उघड झाले आहे.

कंपनीचे अनधिकृत अतिक्रमण, चुनखडी उत्खनन घोटाळा, बेकायदेशीर सार्वजनिक रस्त्यावर कब्जा, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी भूपृष्ट अधिकार भूसंपादन भूमापन मोजणी व सीमांकन निश्चित न करता झालेले उत्खनन, वन वैभवात भर टाकणाऱ्या झाडांची ऱ्हास, खदान परिसरात वाळवंटा सारखी निर्माण झालेली परिस्थिती, आदिवासीचे झालेले शोषण असे अनेक प्रकार नागरिक ‘उघडा डोळे बघा नीट’ अशी हाक प्रशासनाला करत असताना अनेक तक्रारीची चुकीच्या पद्धतीने चौकशी व चुकीचा चौकशी अहवाल शासन प्रशासनाकडे देऊन नागरिकांची दिशाभूल केल्या जात आहे.
दोन वर्षांपूर्वी गडचांदूर येथे कंपनीच्या हद्दीत नवीन युनिट सुरु करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी घेतली होती. त्यावेळी गडचांदूर येथील नागरिकांसह परिसरातील अनेक नागरिकांनी प्रखर विरोध दर्शविला. व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले. नवीन प्रकल्प उभारणीसाठी ना हरकत मिळावी म्हणून बैलेमपुर रोड गेट क्रमांक 2 बंगाली कॅम्प जवळ असलेल्या खाली जमिनीवर तीन वर्षापूर्वी दहा एकर परिसरात मिश्र रोपवन लागवड केली. ही रोपे पाच ते सात फुटाची असताना माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापनाकडून शहरात व परिसरात वृक्षलागवडीच्या कामाला गती देणे ऐवजी लागवड केलेली रोपांची कत्तल करून त्या ठिकाणावर सौर ऊर्जा पावर प्रकल्प निर्माण करण्याचे कामाला वेगाने सुरुवात केली. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वृक्ष लागवडीचा पुळका व पर्यावरण संबंध कंपनी किती गंभीर आहे हे भासविण्याचा व स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये तर तरबेज असलेल्या अधिकाऱ्यांनी गडचांदूर शहर तापमानाने प्रदूषणाने ग्रासले असताना नव्याने सौर प्रकल्प तयार करणे म्हणजे दुखण्यावर मिट सोडण्याचा प्रकार या लागवड केलेल्या वन विभाग किंवा पर्यावरण व महसूल विभागाच्या कोणती परवानगी न घेता दिशाभूल करून कटाई करण्यात येत आहे. नियमबाह्य नागरिकांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळ मांडून कोणतीही परवानगी नसताना विविध जातीची लागवड केलेली रोपे भूमातेला हिरवा शालू चा गारवा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र कंपनीने सर्व नियम धाब्यावर ठेवून खुलेआम वृक्षाची कटाई बिना परवानगीने करून पुन्हा एकदा कंपनीने दबंगगिरी चा परिचय दिला आहे. यावर आवर घालण्याचे काम राज्यकर्ते व प्रशासन करेल का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आबीद अली यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे प्रदूषण तसेच वृक्ष लागवड कामाची व सौर प्रकल्प उभारणीची चौकशी करून दोषी कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भेट घेऊन केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here