अकोल्यात राष्ट्रवादी शिवसेना युती, काँग्रेस आघाडीच्या बाहेर तर भाजप चे दोन प्रभागात उमेदवारच नाहीत…..

0
475

अकोल्यात राष्ट्रवादी शिवसेना युती, काँग्रेस आघाडीच्या बाहेर तर भाजप चे दोन प्रभागात उमेदवारच नाहीत…..

 

अहमदनगर
संगमनेर , १४/१२/२०२१
(प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)…
कालचा दिवस हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस असताना ,अकोल्यात अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडी खूप वेगाने घडल्याने काही वेळ मोठा तणाव निर्माण झाला. भाजपच्या महिला उमेदवाराने प्रभाग एक मधून माघार घेतल्याने , व सात मध्ये उमेदवारी नसल्याने भाजप ११ जागेवर निवडणूक लढवत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी यांची भक्कम आघाडी झाली असली तरी तीन ठिकाणी त्यांचे उमेदवार एकमेका समोर आल्याने तिथे ही गोंधळ पाहायला मिळाला.राष्ट्रवादी दहा, तर सेना तीन ठिकाणी निवडणूक लढवत असून काँग्रेस पक्षाने सहा ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत.
प्रभाग एक मधील महिला उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने , काही वेळ अकोल्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व्हिडिओ चित्रीकरण दाखवल्याने हा मुद्दा गौण ठरला व स्वतः उमेदवाराने माघार घेतल्याने हा तणाव कमी झाला. भाजप चे दोन प्रभागात उमेदवारच नसल्याने त्यांना हा निवडणुकी पूर्वीच मोठा हादरा बसला आहे. वॉर्ड सात मध्ये भाजप अपक्ष उमेदवार पाठिंबा देण्याची शक्यता असून , एक मध्ये भाजप काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचे समजते. काँग्रेस पक्ष काल पुन्हा तणावात दिसून आला, मधुकर नवले , मिनानाथ पांडे हे काँग्रेस चे दिग्गज अखेर पर्यंत महा विकास आघाडी करण्याचे आवाहन करत होते , मात्र आमदार किरण लहामटे ,यांनी तडजोड न केल्याने आम्ही एकाला चला रे मार्ग निवडला असे पांडे व नवले यांनी सांगितले.
आमदार किरण लहामटे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला असून, काँग्रेस ची अवास्तव मागणी मान्य न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे आमच्या प्रतिनिधी सोबत धुमाळवाडी येथे रात्री सांगितले.
मनसे ही तीन ठिकाणी निवडणूक लढवत असून उर्वरित ठिकाणी काही अपक्ष यांना पाठिंबा देऊ असे , हेमंत दराडे यांनी सांगितले.
अकोल्यात काही लढती लक्षवेधी होणार असून भाजपचे सोनाली नायकवाडी तर सेनेचे गणेश कानवडे अशी सरळ लढत आहे. काही दिवसापूर्वी वयक्तिक टोकाला गेलेला वाद हा राजकीय आघड्यात उतरला असून , या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कानवडे यांच्या बरोबर असल्याने ते चांगली आघाडी घेतली असे अकोले सेना अध्यक्ष नितीन नाईकवाडी यांनी सांगितले, तर माझा विजय माझ्या विकास कामावर असल्याचे सोनाली नाईकवाडी यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेतृत्व आमदार व लोक नेते सीताराम गायकर पाटील हे करत असून, गायकर यांचे मोठ वर्चस्व शहरात असल्याने , व अजित पवार यांची अकोल्यात दोनच दिवसात मोठी सभा होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची ही जमेची बाजू आहे. तर कैलास वाकचौरे व माजी आमदार वैभव पिचड हे भाजपचे दिग्गज नेते रात्र दिवस कष्ट घेत असून , अकोल्यातील पुरोगामी विचारांची जनता त्यांना पुन्हा स्वीकारणार का ,हे पाहणे ही एक उत्कुचता आहे. काँग्रेस पक्ष भाजप ची बी टीम असल्याचे आरोप केले जात असले तरी वॉर्ड क्रमांक एक मधून भाजपने काँग्रेस उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला तरच या वर शिक्का मोर्तब होईल. पण आज तसे चित्र नाही. बाळासाहेब थोरात व तांबे या निवडणुकीत अकोले काँग्रेस ला किती मदत करतात हे ही पहावे लागेल. आज भाजपचा प्रचार नारळ फुटला जाणार असून, काँग्रेस ने तो कालच प्रदीप नायकवडी यांच्या मतदार संघात फोडला आहे. अजित पवार यांची अकोल्यात होणारी सभा बरेच काही सांगून जाणार असल्याने , व गायकर यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस सेनेला सत्ता मिळवून देण्यास नक्कीच यशस्वी होईल असे तरी चित्र आहे. २१ तारखेला मतदान असून बावीस तारखेला कोण किती पाण्यात याचे निकाल येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here