खाजगी कंपनीच्या विरोधात सुशिक्षित बेरोजगार युवकांचा एल्गार

0
639

तरुण बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याकरिता उपोषणाला सुरवात

 

स्थानिक तरुणांना डावलून बाहेर राज्यातील युवकांना कंपनीत स्थान

 

288 बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार देण्याची मागणी

 

राजकीय सामाजिक युवा तरुणांचा आंदोलनाला पाठिंबा

 

Impact24 news

तालुका प्रतिनिधी

पुरुषोत्तम गेडाम

यवतमाळ/झरी जामणी:- तालुक्यातील सुशिक्षित व प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना आरसीसीपीएल सिमेंट कंपनी व बी एस इस्पात कोळसा खदान मध्ये रोजगार मुकावे याकरिता नौकरी देण्यात यावे आशिबमाग्नी घेऊन मुकुटबन येथील बसस्थानक जवळ तरुणांनी दोन्ही कंपनी विरुद्ध एल्गार पुकारून 2 ऑगस्ट पासून उपोषणास सुरवात केली आहे.

नियमाने कंपणीला 80 टक्के नौकर भरती स्थानीक तरुणांना देणे बंधनकारक असतांना कंपनीत बाहेर राज्यातील लोकांना नौकरी देण्यात येत आहे व स्थानिक तरुणांना डिग्री ,डिप्लोमा ,प्रशिक्षण व शिक्षण नाही असे म्हणत नौकरी दिल्या जात नाही. दोन्ही कंपनीत काही राजकीय व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नातेवाईकांचा भरणा मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी करण्यात आला मग बेरोजगार तरुणांकरिता का नौकरी नाही असा संतप्त प्रश्न बेरोजगार तरुण युवक करीत आहे. कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या लोकांचे नातेवाईक चांगल्या पोस्टवर काम करीत आहे तर तालुक्यातील सुशिक्षीत व प्रकल्पग्रस्त तरुण बेकार फिरत आहे. कंपणीच्या अडेलट्टू व मुजोर धोरणामुळे स्थानिक तरुणांना रिजगर मिळत नसून बाहेर राज्यातील लोकांना कामावर ठेवले जात आहे. दोन्ही कंपनीच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध तालुक्यातील 100 ते 150 तरुणांनी एल्गार पुकारला आहे व आमरण उपोषणाला सुरवात केली आहे व जोपर्यंत 288 तरुणांना रोजगार देणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे भूमिका घेण्यात आली आहे.

बी एस इस्पात कोळसा खानमधील आधीकार्याने तरुणांना कामावर घेतो असे म्हणत अनेक तरुणांची ड्रायवर ट्रायल घेतली. परंतु 6 महिने लोटूनही त्या तरूणांना कामावर घेतले नाही. तरुणांच्या भावनेशी खेळत नौकरिवर घेतले व त्यांची फसवणुक केली तरुण युवकविरुद्ध विविध भध्या करून बदनाम करण्याचे षडयंत्र सुद्धा करीत आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याविरुद्ध प्रचंड संताप तरुण युवकात आहे. तर एक युवकाला नौकरी देती म्हणून आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास लावला व त्या तरुणाला अजूनही नौकरी न देता त्याची बदनामी केली अश्या अधिकाऱ्याला उपोषणाद्वारे जागा दाखविल्या शिवाय पर्याय उरणला नाही असा निर्धार तरुणांनी केला आहे.

उपोषणाची माहिती मिळताच सदर अधिकारी घाबरून सुट्टीवर निघून गेल्याची माहिती आहे. खाजगी कंपनीच्या विरोधात आंदोलन उपोषण किंवा निवेदन दिल्यास कंपनीतील अधिकारी त्या तरुणांना कोणतेही कारण दाखवून नौकरी देत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो तरुण एकत्र येऊन उपोषण सुरू केले आहे व

तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना कॅम्पनी मध्ये घ्या. अकुशल युवकांसाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करून त्यांना त्याच कँपनी मध्ये रोजगार उपलब्ध करून द्या, सर्व कामगाराचा विमा काढा, 3 जानेवारी ला झालेल्या घटनेतील युवकांवर कँपणीत रोजगार उपलब्ध करून द्या अशी मागणी उपोषण उपोषण करत्यांनी केली आहे. उपोषणाची सुरवात होताच तालुक्यातील शेकडो तरुणासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या सोबत सरपंच निलेश येल्टीवार, राहुल दांडेकर हरिदास गुर्जलवार यांनी भेट देऊन तरुणांच्या समस्या जाणून घेतल्या तर मुकुटबन ग्रामपंचायत सरपंच मीना आरमुरवार सदस्य बबिता मुदमवार सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे,संतोष बरडे सह व्यापारी ,शिक्षक व विविध पक्षाचे अध्यक्ष यांनी भेटी दिल्या व शिवक्रांती कामगार संघटना व विविध संघटनेनी व पत्रकार बंधूनी पाठिंबा दिला आहे. तरुणांना न्याय मिळण्याकरिता सर्वच राजकीय पुढारी व लोकप्रनिधी उपोषणाला पाठिंबा देणार असल्याचे माहिती आहे त्यामुळे तरुणांच्या उपोषणाला यश नक्कि मिळणार नाही तर उपोषण अधिक तीव्र स्वरूपाचे होणार असल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले आहे.

उपोषण करिता आझाद उर्फ गजानन उदकवार, पंढरी धांडे, सुनील जींनावार ,उमेश पोतराजे , अनुप दगडी बसले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here