माणसं मेल्यावर नगर परिषदेला जाग येणार का?
वणी (यवतमाळ)/प्रतिनिधी : पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. शहरातील रस्त्यात असणारे मोठे जीव घेणाऱ्या खड्डयात पाणी साचून असले की अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्याचे खड्डे कधी बुजविणार हे जनतेला माहीत नाही.
वणी नगर परिषद ने नांदेपेरा रस्त्यावरील नगर परिषद शाळा क्र 5, च्या दोन्ही बाजूला दोन मोठे खड्डे खोदून ठेवले. या खड्याला तीन महिने झाले. मात्र अजूनही त्या खड्यात काय करायचं आहे हे माहीत नाही. नगर सेवकांना विचारले तर ते कंत्राटदाराचे काम आहे. त्यांना काहीच माहीत नाही. या खड्डयाबाबत माहिती देऊन तो लवकर बुजविण्यात यावा असे सांगितले तरीही त्यांनी लक्ष दिले नाही.
आता खड्डयात लहान मुलं, कोणी नागरिक पडल्यावर त्यांचा जीव गेला की वणी नगर परिषद ला जाग येईल का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. जर खड्डयात पडून कोणाचा मृत्यू झाल्यास याला जवाबदार संपूर्ण नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेवर असणाऱ्या सर्व सत्ताधारी, या भागाचे नगर सेवक, कंत्राटदार राहतील असे नागरिकांचे म्हणणे आहे.