हिरापुर येथील तरुण शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या… कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

0
500

हिरापुर येथील तरुण शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या…
कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर…


राजुरा(चंद्रपूर): राजुरा तालुक्यातील हिरापुर गावातील आज दिनांक १५/७/२०२१ ला रात्री 2 वाजताच्या सुमारास विलास रामदास शेरकुरे वय 32 वर्ष.या शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.शेतमजुरीची कामे करायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असल्याने घरात लागणार जीवनावश्यक वस्तू ,आरोग्य, आर्थिक संकटांना तोंड ध्यावे लागत होते.त्यांचे घर टीन पत्रे आणि बाबूंनी बनवलेले टाटव्याचे आहे त्यांचा कुटुंबात पत्नी,मुलगी आणि एक मुलगा असा छोटा परिवार आहे.हातावर आणायचे आणि पानावर खायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा,
कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले.
विलास रामदास शेरकुरे हा खूप चांगला व्यक्ती होता.गावात त्यांचे चांगले संबंध होते अडीअडचणीला तो सहकार्य करत होता.त्याच्या मृत्यू ने गावात हळहळ व्यक्त होत आहे .
शासनाने त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी गाव वासीयांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here