सरळ सेवा पद भरती नव्याने घेण्याची सुदाम राठोड यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र सरळ सेवा पद भरती त्वरित नव्याने भरणे बाबत सदर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भ राज्य युवा आघाडी चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष सुदाम भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात पाठवले.
आपल्या राज्यामध्ये सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. म्हणून सरकार महोदय गेल्या तीन वर्षांपासून नोकरभरती प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे बेरोजगारांची महाराष्ट्रामध्ये संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांचा परिणाम युवा बेरोजगारांवर होत आहे. तसेच युवक मानसिक रित्या खचत चालले आहेत परिणामी काहीनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये व्यवसाय, उद्योगधंदे सुरळीत सुरू आहेत. तर मग स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र बंद का? महोदय विदयार्थ्यांचे मरण हेच महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे काय? हे तरी सादर करा नाही तर सरळसेवा भरती त्वरित चालू करा, भरती न केल्यास विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे.
म्हणून महोदय याचा उद्रेक होण्याच्या आधीच आपण सर्व विभाग निहाय नव्याने पद भरती चालू करून परीक्षांची तारीख जाहीर करावी. इतर परीक्षांच्या जाहिराती व वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर कराव्यात. सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्याल, अशी विनंती करत मागणी १५ दिवसात मान्य न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करेल. या आंदोलनामध्ये काही हिंसक घटना घडल्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील. अशी घोषणा सुदाम राठोड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, विशाल राठोड, शुभम वालदे, मयूर मेश्राम, कुंदन लांजेवार, अमर गाडगे, संदीप कामडी व निखिल डांगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.