विशेष प्रतिनिधी/किरण घाटे
उस्मानाबाद :- रुग्ण कल्याण समितीच्या पाणी दान उपक्रमात आज साेमवारला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त राजरत्न दादा शिंगाडे युवा मित्र परिवार मंडळाच्या वतीने उस्मानाबाद महिला रुग्णालयात पाणी दान करण्यात आले.पाणी दात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परिचारिका रंजना दाणे यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जिवन कार्यावर आपल्या भाषणातुन प्रकाशझाेत टाकला .माता अहिल्याबाई यांची अचुक अशी नेमबाजी होती,त्यांनी भटक्या विमुक्त जमाती साठी त्या वेळी यशस्वी नियोजन केले होते,मेंढ्या शेळ्या करिता त्यांना कोट्यवधीची शेतजमीन दिली होती.आज त्यांच्या कार्याला स्मरुन राजरत्न दादा शिंगाडे युवा मित्र मंडळा कडून सामाजिक उपक्रम राबविला जात आहे तो कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाला लॅब. टेक्निशियन संतोष कुंभार राजरत्न दादा शिंगाडे,सोनु थोरात,टिल्लु वाघमारे,अजय आदमाने, कुमार कांबळे,भागेश वाघमारे,सुरज झेंडे, सुबोध शिंगाडे तर रुग्ण कल्याण समिती सदस्य लतिफ मजीद, गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,दिपक पांढरे,सचीन चौधरी उपस्थित होते.