‘कोरोनामुळे मृत्यु’ या मानसिकतेतुन बाहेर पडा – अश्विन मेश्राम

0
474

‘कोरोनामुळे मृत्यु’ या मानसिकतेतुन बाहेर पडा – अश्विन मेश्राम

मागील २२ मार्च २०२० पासुन करोणाच्या संसर्ग वाढल्यामुळे संपुर्ण देशात आणि त्यानंतर आवश्यकते नुसार राज्यात , जिल्ह्यात लाँकडाउन लावण्यात आले होते थाळी, टार्च , टाळी अश्या भावळ्या प्रकारात लोकांनी सहकार्य ही दिले आणि करोणाला महामारी च्या रूपात सोसीयल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ने दाखविले पंरतु आजपर्यत संपुर्ण भारतात करोणामुळे मृत्यु पावलेल्या एकाही व्यक्ती चे पोस्ट मार्टम झाले नाही ज्यामुळे त्या व्यक्ती चे मृत्युमागील मुख्य कारण काय होते हे सांगता येईल वँक्सिन घेतल्यावर ताप येतो. आणि त्यामध्ये त्याचा मृत्यु होतो किंवा व्याक्सिन घेतल्यावर कोरोना होणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे व्याक्सिन घ्यावी की नाही हा प्रश्न निर्मान होत असुन आरोग्य विभागाकडे संदेह दृष्टिकरणातुन पाहले जात आहे. सरकारने त्यांचे निराकरण केले पाहीजे.
बहुतांश व्यक्ति टायफाइड, बिपी, शुगर, हार्ट च्या अश्या अनेक आजाराशी झुंजत असतांना करोणा पाँझिटिव्ह आला तर दवाखाण्यात भरती होतो. त्यात इतर आजाराचे उपचार मागे पडतात आणि करोणाचा उपचार होतो. अशात मृत्यु पावला तर इतर कुठल्याही आजाराने मरण पावला असेल तरी करोणा नी मरण पावला सरकार आकडेवारीत दाखविते. त्यामुळे लोंकामध्ये भितीचे वातावरण तयार होते आणि करोणा या इतर आजारांशी झुंजत असतांना व्यक्तीचा अचानक मृत्यु झाला तर तो नेमका करोणांनी या इतर कुठल्या आजाराने मृत्यु पावला हे पोस्ट मार्टम केल्याशिवाय माहीती होऊ शकत नाही. ते पोस्ट मार्टम आज पर्यत एकाही व्यक्तिचे झाले नाही त्यामुळे तो व्यक्ति करोणाने मृत्यु आकडेवारीत मात्र करोणामुळे मृत्यु दाखविले जाते.
करोणा यायच्या आधी पण निमोनिया होताच तेव्हा सुध्दा तीच लक्षने होती जे आज करोणाची आहेत तरीपण लोक समर्थ पने त्यावेळी लढले.
सर्दी, ताप, खासी, चव नसने इतर लक्षने करोणाची असुन जिव घेणी नाही. त्यामुळे करोणा संसर्ग असला तरी जिवघेण्या सारखे नाही. व्यक्तीची बुध्दि कुठल्याही आजाराशी लढण्याकरीता सक्षम असते त्यावर मानवी प्रतीकार शक्ति काम करते परंतु नेहमी आजारा विषयी भिती व निगेटिव भुमिका ठेवली तर मानवी बुध्दि त्या आजाराची लक्षने शरीरात तयार करीत असते.
मागच्या वर्षाला नोव्हेबर- डिसेंबर मध्ये करोणा कुनी चेक नाही केले त्यांना हिवाळा ऋतु मध्ये करोणा होऊन ही गेला असेल ते लोकांना स्वताला कळले नाही आणि सरकार कडे ही त्यांची काहीच आकडेवारी नाही.
फेब्रुवारी महीण्यापासुन कुणी करोणा झाला तर नाही या भीती ने अटँक येवून दगावत आहेत एवढे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि एकदा करोणा झाला की तो स्वताला मृत्यु च्या जवळ पाहतो आहे त्यामुळे लोकांनी करोणामुळे व्यक्ती मृत्यु होतो या मानसिकतेतुन बाहेर पडावे आणि संसर्ग असल्यामुळे इतरापासुन दुर राहीत सामान्य आजारासारखे करोणाकडे पाहावे जेनेकरून प्रतिकार शक्ति वाढेल असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अश्विन मेश्राम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here