चलो नागपूर- ‘वज्रमूठ ‘ विराट सभेत सर्वांनी उपस्थित रहावे : राजु रेड्डी
घुग्घूस : महाविकास आघाडीच्या वतीने नागपूर येथील सुधार प्रण्यास पटांगणावर भव्य विराट अशी वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यात आले असून सदर सभा ही सांयकाळी साडेपाच वाजता होणार असून यात नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहतील.
राज्यातील एकनाथ शिंदे + देवेन्द्र फडणवीस यांच्या ईडी शासनाने राज्यातील उद्योग गुजरातला पळवून स्थानिक युवकांशी गद्दारी केली आहे. वारेमाप वीज बिल वाढवून सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
अर्थसंकल्पात ओबीसी समाजाच्या कल्याणार्थ असलेला बजेट 400 कोटींपेक्षा कमी केला आहे.
सत्तर हजार पदाची भर्ती ही सरकार आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करून संविधानाने दिलेले आरक्षण संपविन्याचा घाट या सरकारने रचला आहे.
राज्यातील सर्व घटकांवर अन्याय करणाऱ्या या ईडी सरकारला उखडून फेकण्यासाठी या वज्रमुठ सभेत सर्वांनी हजारोच्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राजु रेड्डी यांनी केले आहे.