शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0
472

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 

राजुरा : तालुक्यातील टेंबुरवाही येथील शेतकरी बळीराम कुमरे (70) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आज सकाळी आली.

सततच्या अतिपावसाने संपूर्ण पिके उद्धवस्त झाली तसेच बँकेचे कर्ज अंगावर होते. ते फेडायचे कसे या नैराश्येतून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंड असा आप्त परिवार आहे.

विरुरचे ठाणेदार राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी वागदरकर, अशोक मडावी व पोलीस चमुंनी पुढील कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here