पाऊसामुळे बेघर झालेल्यांना शासनाने तात्काळ मदत करावी – महेंद्र बाग
चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच सततच्या अति पावसाने घरांची पडझड झाली असून अनेक कुटुंबे रस्तावर आली आहेत. घुग्घुस येथील अमराई वार्ड क्र. १ मधील बरेच उडिया झोपडपट्टीतील घरे कोसळली. त्यामुळे सतत मुसळधार पावसाने भरपूर नुकसान झाले आहे. शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी काँग्रेस नेते महेंद्र बाग यांनी करत निवेदन दिले.
यावेळी अमराई वार्डातील झोपडपट्टीतील काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाग सह तेथील नुकसान ग्रस्त नागरिक उपस्थित होते.