तुम्ही आमची लाईट कापा आम्ही तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवू शेतकरी मनीष जाधव यांचा महाविकास आघाडी सरकारला गंभीर इशारा
यवतमाळ : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला. आता शेतकऱ्यांची संपूर्ण मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. पीक जगविण्यासाठी सिंचन आवश्यक आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने बिल वसुलीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. या पठाणी वसुलीने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहे. वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली जात आहे. तुम्ही आमच्या डीप्या बंद केल्या, आम्ही निवडणुकीत तुमचा फ्यूज उडवू, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांकडून राज्य सरकारला दिल्या जात आहे.