तरुणावर धारदार चाकूने हल्ला, राजुरा तालुक्यातील घटना

0
1295

तरुणावर धारदार चाकूने हल्ला, राजुरा तालुक्यातील घटना

 

 

राजुरा, अमोल राऊत (७ ऑक्टो.) : सध्या जिल्ह्यात शुल्लक वाद, टोळी वाद यासारख्या वैमनस्यातून गुन्हेगारी वृत्तीत वाढ होताना दिसून येत आहे. असाच एक प्रकार आज राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे घडला. विहिरगाव येथे एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुल्लक वादातून घडली. जखमी तरुणाचे नाव ईश्वर श्रीधर टेकाम (२३) असे आहे. हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आरोपी अल्ताफ शब्बीर शेख स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. पोलिस प्रशासनाचा वचक नसल्यामुळे विहीरगाव तसेच संपूर्ण क्षेत्रात गुन्हेगारी वाढत चालली आहे. अन्यथा विहीरगाव व परिसरात सुद्धा बल्लारपूर सारखी गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी पोलीस प्रशासनाने वेळीच सावध राहून योग्य पाऊले उचलणे अभिप्रेत आहे. पोलीस विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देत भविष्यात बळावणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आवर घालावा अशी मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे. विरुर स्टेशन पोलीस पुढील तपास करत आहे. वृत्त लिहितोस्तर आरोपीवर गुन्हा दाखल झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here