कामावरून काढलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना रुजू करण्यासाठी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…
उस्मानाबाद – अमोल मुसळे
मो- 9405608508
उस्मानाबाद -महाराष्ट्रभर कोरोना महामारीच्या काळात कंत्राटी पध्दतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली होती, त्या कठीण काळात आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपली सेवा चोख रित्या बजावून अनेकांचे जिव वाचवले. आज कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे, अशाच काही उस्मानाबाद येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आचनक कामावरून कमी करण्यात आले.
त्यामुळे संतृप्त होऊन महामारी योद्धा संघर्ष समिती उस्मानाबाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले, यावेळी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे साहेब व छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राणजीत गवंडी यांनी आंदोलनास भेटून पाठींबा दिला. या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करावे. अन्यथा न्याय न मिळण्यास सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन थेट मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाऊ असा सरकारला इशारा देण्यात आला .