आेबीसींचे आरक्षण कायम ठेवावे-माळी महासंघाची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
496

आेबीसींचे आरक्षण कायम ठेवावे-माळी महासंघाची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

किरण घाटे विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर –   स्थानिक स्वराज्य संस्थेतील आेंबीसींचे आरक्षण पूर्वि प्रमाणे कायम ठेवून आेबीसी जनगणना करावी अश्या आशयाची मागणी नुकतीच चंद्रपूर माळी महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कडे एका लेखी निवेदनातून करण्यांत आली .या संदर्भात मूलचे तहसीलदार डाँ .रवीन्द्र हाेळी यांना चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षा तथा माळी समाजाच्या जेष्ठ नेत्या संध्या गुरनुले , समाजाचे मार्गदर्शक तथा भूतपूर्व जि.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडाेळे , मूल माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष राकेश ठाकरे यांनी एक निवेदन दिले आहे . सदरहु निवेदन सादर करतांना प.स.सदस्य वर्षा लाेनबले , प्रा.सुधिर नागासे , प्रा.विजय लाेनबले , वासुदेव लाेनबले नितिन गुरनुले , हसन वाढई , गुरुदास चौधरी , गुरु गुरनुले , अशाेक महाडाेळे , रत्ना चौधरी , माधुरी गुरनुले , बंडु गुरनुले आदीं समाज बांधव उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here