शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी जालना जिल्ह्यातील प्रहार सैनिकांनी केला केंद्र सरकारचा निषेध
जालना, प्रतिनिधी राजेंद्र गायकवाड : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी विरोधी लागू केलेले तीन कायदे रद्द व्हावे, यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. २६ मे रोजी मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण होत आहे. शेतकरी विरोधी कायदे करणार्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध म्हणून महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज २६ मे रोजी जालना प्रहार सैनिकांच्या वतीने अंबड शहरात घरावर काळे झेंडे लावून निषेध दर्शविले आहे. या ठिकाणी अंबड तालुक्यातील सर्व प्रहार सैनिकांनी मोठमोठ्या ने घोषणा देत केंद्र सरकार चा जाहीर निषेध केला आहे.
यावेळी विदूर लाघडे जिल्हाध्यक्ष (प्रहार जनशक्ती पक्ष जालना), संदीप धुळे (जिल्हा सचिव जालना), राजेंद्र गायकवाड (तालुकाध्यक्ष अंबड) जुबेर पटेल (प्रहार रूग्ण सेवक अंबड) किसन गायके , दिपक गाढे, केशव लाघडे, शिवाजी गायके,शुभम पालकर आदी प्रहार सैनिक उपस्थित होते.