बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात छोट्या आजाराने येणारे रूग्णांना थेट जिल्हा रुग्णालयात पाठवू नका
विरेन्द्र पुणेकर बल्लारपूर :- आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार जी यांच्या नजरेत आले की बल्लारपुर ग्रामीण रुग्णालयात किरकोळ आजारांनी ग्रस्त रुग्णांना थेट जिल्हा रुग्णालय चंद्रपूर इथे पाठविण्यात येत आहेत. देशात (Covid-19) आजारामुळे जिल्ह्यात संपूर्ण रुग्णालये पूर्ण भरली आहेत, जिल्हा रूग्णालयातही बेड मिळविणे अवघड आहे, गरजू रुग्णांना बेड मिळत नाही, बर्याच रुग्णांना ऑक्सिजन आणि बेड वेळेवर उपलब्ध होत नाही, अशी परिस्थितीत बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील जबाबदार डॉक्टर साध्या हगवण, उलटीसारखे रुग्णांना ग्लूकोज चढवून थेट चंद्रपुरात पाठवणे योग्य नाही. रुग्णांना आणि त्याच्या कुटुंबीयांना खूप त्रास सहन करावा लागला आहे, अशा आपत्तीच्या वेळी सरकार कोविड -१९ केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी बनविण्यात गुंतली असून बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाची सर्व बेड रिक्त पडून आहे, सामान्य माणूस अशा आपत्तीच्या वेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरणकाळे अपेक्षा करत आहे, आपली जबाबदारी पार पाडत योगदान द्यावे आणि ग्रामीण रुग्णालयाच्या बेडांची रिक्त जागा ठेवणे गंभीर बाब आहे, या गंभीर विषयावर बल्लारपूर शहरातील आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक राठोड साहेबांची भेट घेतली आणि समस्येची माहिती दिली, ज्यावर जिल्हा शल्य चिकित्सक राठोड साहेब आमच्या समोर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचार्यांना कॉल करून आदेश दिला की किरकोळ आजारामुळे रूग्णांना चंद्रपूर येथे रेफर करू नये, अशी परिस्थिती समोर नाही दिसणार आशा आश्वासन दिले।
निवेदन सादरते वेळी बल्लारपूर शहर अध्यक्ष- रविकुमार शंकर पुप्पलवार, उपाध्यक्ष- सय्यद अफझल अली कोषाध्यक्ष- आसिफ हुसेन शेख, क्रांतिकारी कार्यकर्ते समशेर सिंह चौहान आणि सय्यद अझर अली मौजुद होते.