निवडणुकीच्या काळात मतदार यादी गैरप्रकारामुळे मतदारांची नावे वगळण्याची घटना लोकशाहीला मारक, आपची चौकशीची मागणी

0
49
निवडणुकीच्या काळात मतदार यादी गैरप्रकारामुळे मतदारांची नावे वगळण्याची घटना लोकशाहीला मारक, आपची चौकशीची मागणी
निवडणुकीच्या काळात मतदार यादी गैरप्रकारामुळे मतदारांची नावे वगळण्याची घटना घडली आहे. ही बाब लोकशाहीला मोठा धक्का देणारी आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा मूलभूत हक्क बजावणे शक्य होणार नाही.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांचेही नाव गैरप्रकारामुळे मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गैरप्रकारांची चौकशी समिती स्थापन करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीची हत्याच होय.आ आम आदमी पार्टीकडे शेकडो लोकांच्या तक्रारी आल्या की आमचे नाव मतदार यादी मधून जाणीवपूर्वक वगळण्यात आले. याबाबत तक्रार करण्याकरता तहसीलदार यांच्याकडे गेले असता आता काही करता येणार नाही तुम्ही तक्रार करा असे म्हटले अशा घटनांमुळे लोकशाहीची प्रक्रिया बिघडते. मतदार यादी गैरप्रकारामुळे नावे वगळण्याची ही घटना अत्यंत गंभीर असून याची सखोल चोकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.”
मतदार यादीमध्ये झालेल्या अशा गैरप्रकारांमुळे अनेकांचा मतदानाचा मूलभूत हक्क हिरावला जाणार आहे. लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्त्व लक्षात घेता ही घटना अतिशय गंभीर आहे. आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे याकडे तात्काळ लक्ष देण्याची व गैरप्रकारांची सखोल चोकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना धक्का निवडणूक आयोगाने लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here