सर्व पूरग्रस्तांना भरपाई द्या…! – आम आदमी पार्टी बल्लारपूर ची मागणी

0
425

सर्व पूरग्रस्तांना भरपाई द्या…! – आम आदमी पार्टी बल्लारपूर ची मागणी

आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी नुकसानग्रस्तांची भेट घेतली. बल्लारपूर शहरातील किल्ला वॉर्ड आणि गांधी वॉर्डमध्ये अशी असंख्य कुटुंबे आहेत ज्यांची घरे अद्याप पुराच्या पाण्यामुळे सरकारी मदतीपासून वंचित आहेत. पीडित कुटुंबे दररोज नगरपरिषद, तहसील च्या फेऱ्या मारत आहेत. “आप” बल्लारपूरच्या शिष्टमंडळाने त्वरीत पूरग्रस्तांची भेट घेताच नगर परिषद बल्लारपूरचे उपमुख्याधिकारी जयंत काटकर व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले.

प्रत्येक पूरग्रस्तांना मदत मिळेल. राहून गेलेल्या कुटुंबांच्या नावांची आठवण पूरग्रस्त निरीक्षकांना करून दिली. दोन दिवसांत नगरपरिषदेचा असा उपक्रम न दिसल्यास आम आदमी पार्टी करेल.

आसिफ हुसेन या विषयासंदर्भात सर्व पूरग्रस्तांना सोबत घेऊन चळवळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बल्लारपूर शहराचे कोषाध्यक्ष आसिफ शेख यांनी FB लाईव्हच्या माध्यमातून दिली.

शहराध्यक्ष रविकुमार पुपलवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव पवन वैरागडे, कोषाध्यक्ष आसिफ शेख, मीडिया प्रमुख सागर कांबळे, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, सचिव ज्योतीताई बाबरे, सहसचिव शितिल झाडे, संघटन मंत्री सरिता गुजर, सुधाकर गेडाम, रोहित जंगमवार, गगन सकीनाला, प्रणय नगराळे, शंकर कनकुटला व पूरग्रस्तांचे कुटुंबीय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here