शेतकऱ्याची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या 

0
675

शेतकऱ्याची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या 

मूल पोलीसानी केला मर्ग दाखल

मूल : तालुक्यतील कांतापेठ येथील एका शेतकयांने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी 2 वाजता उघडकीस आली, रामदास बापूजी गावतुरे वय 60 वर्षे रा. कांतापेठ असे मृत्तक शेतकऱ्यांचे नांव आहे.मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील शेतकरी रामदास बापुजी गावतुरे यांच्याकडे चिरोली शेतशिवरात 22 आर शेती आहे, आज दुपारी ते शेतावर गेले असता त्यांच्या शेताच्या बाजुला भिमराव कुंभरे यांची शेती असुन त्याच शेतामध्ये मोठी विहीर आहे. रामदास गावतुरे हा सदर शेतातील विहीरीमध्ये उडी घेवुन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण बातमी लिहीतपर्यंत कळले नाही. मृत्तकाच्या पश्चात पत्नी आणि विवाहीत मुलगा,मुलगी आहे.

घटनास्थळाला मूल पोलीसांनी भेट देवुन पंचनामा केले व मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here