स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक घाणीत…
नगरपालिकेला क्रांती दिनाचा विसर ..
वणी मनोज नवले
स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले. त्यांचे बलिदान देश्यासाठी होते म्हणून शहरात त्यांचे स्मारक बांधण्यात आले. तालुक्यातील एकूण 27 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनचे स्मारक आहे. ज्यांनी बलिदान दिले, त्यांचे स्मारक घाणीच्या विळख्यात आहे.
क्रांती दिनाला नगर परिषद ला त्यांना अभिवादन करायचा विसर पडला. वणीतील स्थानिक महापुरुष समितीने हारार्पण करून अभिवादन केले. वणी नगर पालिकेला क्रांती दिनाचा महत्व माहीत नाही अशी वणी नगर पालिका आहे. त्यामुळे स्मारक उभारून त्याचे संगोपन कसे करायचे हे नगरपालिकेला माहीत नाही. शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेले स्मारक घाणीत सुटकेचा स्वास घेत आहे. ज्यांनी बलिदान दिले, त्या 27 स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाला घाणीत राहावे लागते. ही वणी शहरासाठी खूप मोठी दुर्दैवाची घटना आहे.