अर्णबच भविष्य अंध:कारमय: जयंत माईणकर

0
606

अर्णबच भविष्य अंध:कारमय: जयंत माईणकर

आज अमित शहा , जावडेकर, रविशंकर या केंद्रीय मंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस या माजी मुख्यमंत्री यांना फारच दुःख झालंय .

 

रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे. या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे.. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही.त्यामुळे अर्णब गोस्वामी यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही.
मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प़करणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती.. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प़करण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही.
मुंबईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर (अंतर्गत वास्तुरचनाकार) अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अर्णब व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता.
मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक हे मुंबईत व्‍यवसायानिमित्‍त राहत होते. अन्वय हे मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी ४ मे रोजी अन्वय कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.

या आत्महत्येनंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांची नावे लिहिली होती. तसेच नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल परस्कार यांनी दिली होती.

तहलका फेम तरुण तेजपाल सुद्धा यांच्यावर सुद्धा आपल्या एक सहकार्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यावेळीही पत्रकारांनी त्याना साथ दिली नव्हती. पत्रकारांनी लिहिलेले लेख बातमी यामुळे त्यांच्यावर हल्ले झाले तर गोष्ट वेगळी पण आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा बलात्कार यासाठी अटक होणे ही गोष्ट वेगळी. गुन्ह्याबद्दल अटक झाल्यानंतर हा तर पत्रकारितेवरील घाला असे म्हणत नक्रश्रु ढाळणाऱ्या मोदींच्या भक्ताना माझा सल्ला इतकाच आहे की त्यांनी खाली दिलेली.
मोदी सरकारच्या काळात अटक झालेल्या पत्रकारांची यादी वाचावी. आणि त्यांच्या अटकेची कारणे वाचावी शोधावी आणि मग अर्णबसारख्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संघ समर्थक पत्रकाराच्या बाजूने उभे राहावे.

केसी वांगखेम,ओम शर्मा, एमए गणाई,अश्वनी सैनी, विशाल आनंद, नेहा दीक्षित, सिद्धार्थ वरदराजन,प्रशांत कनोजिया, पवन चौधरी, एएसआर पांडियन,मनीष पांडे,सुभाष राय,विजय विनीत, झुबैर अहमद हे ते अटक झालेले पत्रकार

बलात्काराच्या आरोपानंतर तरुण तेजपालंच करिअर संपल्यात जमा झाल. आज अर्णबच भविष्य तसच दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here