शिवाजी नगर वॉर्ड क्रमांक ९ येथील मार्गावर गतिरोधक बनविण्याची वार्डवासियांची मागणी…
राजुरा : शिवाजी नगर वॉर्ड क्रमांक ९ येथील मुख्य मार्गावर राऊत यांच्या घराजवळ गतिरोधक बनविण्याची मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे वार्डवासियांनी निवेदनातून केली आहे.
मागील ५ वर्षाहून अधिक कालावधीपासून या मार्गावरील वाहतूक दुपटीने वाढली आहे. त्याचप्रमाणे जड वाहतुकीचे आवागमन मोठ्या प्रमाणात वाढले असून या मार्गावर सोनिया गांधी इंग्लिश कॉन्व्हेन्ट असल्याने लहान मुलांची ये जा करण्यासाठी ऑटो रिक्षाची रीघ लागते. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. शिवाय सैराट पणे उन्मादाने वाहने चालविणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. यामुळे अपघातास आमंत्रण निर्माण होत आहे.
याकरिता नगरपरिषद प्रशासनाने यावर उपाययोजना म्हणून तातडीने गतिरोधक बनवावा, अशी मागणी केली आहे. उपाययोजना न केल्यास भविष्यात होणाऱ्या अप्रिय घटनेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी राहुल अंबादे, वामन साळवे, एकनाथ पिदुरकर, रमेश ढवस, अभिजित इरकुलवार, संदीप भोयर, प्रशांत करमनकर, मनोहर बोबडे, विनोद कोंडेकर, नीलकंठ साळवे, श्रीहरी साळवे, दादाजी गाले, किरणकुमार वनकर, प्रतिक कावळे, अनिकेत साळवे, हर्षल गाले, अनुज ढवस, संगिता बुक्कावार, स्वप्नील गाले, संयोग साळवे, आकाश कोडापे, सुधाकर भेंडे, सुलोचना माथनकर, राजकुमार चिंचोलकर, प्रभाकर घोटेकर आदी वॉर्डवासिय उपस्थित होते.