महाविद्यालयाच्या प्रवेशाची तारीख वाढवा

0
421

महाविद्यालयाच्या प्रवेशाची तारीख वाढवा

चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रेय यांची कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ यांच्याकडे मागणी

 

 

चंद्र्पुर : गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाल्यापासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यापीठाच्या नियोजनाच्या अभावामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. असाच प्रकार आता आपल्याला बघायला मिळत आहे. प्रवेश अर्ज भरण्याची विद्यापीठाची लीक बंद झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. अनेक वेळा विद्यार्थ्यांना फॉर्म भारत आला नाही. त्यामुळे ३० तारीख शेवटची असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रवेशाची तारीख वाढवून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची लोकहितकारी मागणी चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांची कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ यांच्याकडे केली आहे.

कोरोना काळात अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात शेतात काम करीत होते. परंतु ग्रामीण भागात त्यांना महाविद्यालयाच्या प्रवेश अर्ज भरण्यासाठी अनेकदा तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र होते. त्यासोबतच विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या निकाल लागला. त्याच दिवशी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांची लीक बंद झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नाही. हा विषय गंभीर असून हजारो विद्यार्थी आता देखील महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्याची तारीख वाढवून हजारो विध्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास सहकार्य करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रेय आणि प्रदेश महासचिव कुणाल चहारे यांनी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here