पौनी 2 साखरी कोळसा खाणीत स्थानिकांना रोजगार द्या – भीम आर्मी (भारत एकता मिशन) ची मागणी

0
481

पौनी 2 साखरी कोळसा खाणीत स्थानिकांना रोजगार द्या – भीम आर्मी (भारत एकता मिशन) ची मागणी

राजुरा येथील पौनी 2 साखरी या गावालागत असलेल्या कोळसा खाणितील उत्खननाचे काम हर्षा या नवीन कंपनी ला देण्यात आले असून लवकरच ते सुरु होणार असल्याची माहिती प्राप्त होताच स्थानिक बेरोजगारांना शासन नियमानुसार 80% रोजगार देणे अनिवार्य आहे. आणि तो त्यांचा अधिकार सुद्धा आहे. असे असताना देखील प्रत्येक कंपनी आपले बाहेरचे कामगार सोबत आणून स्थानिकांना डावलून शासन नियमावलीचे सर्रास उल्लंघन करून आपले काम करीत असते.

या विषयाला घेऊन काल दिनांक 17 फेब्रूवारी रोजी शेकडो युवकांच्या ताफ्या सोबत जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरज भाऊ उपरे भिम आर्मी (भारत एकता मिशन) यांनी घटना स्थळी भेट देऊन निवेदन दिले. कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत स्थानिक बेरोजगार यांना प्राध्यान्य देण्यात यावे अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल, ज्याची सर्वस्वी जवाबदारी कंपनीची राहील अशी तंबी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ग्वाही दिली कि सर्वात आधी आम्ही स्थानिक बेरोजगारांना कामावर घेऊ.

यावेळी प्रामुख्याने सुंदर कस्तुरवार, अनिल चीलमुले, सुरज चाल, ज्ञानेश्वर गोखरे, सत्यपाल गोहोकर, संदीप चंद्रगिरीवार, रिझवान शेख, श्रीनिवास येलकोंडवर, वहाब शेख, आकाश ताकसांडे, नागेश कुमरे, रवी परचाके, विनोद चेनुरवार, भगवान आंबटवार इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here