शेतीच्या कामाला लागला शेतकरी !
चंद्रपूर -✍🏻किरण घाटे विशेष प्रतिनिधी – गत दाेन ते तीन वर्षापासून शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत अडकला असुन दरवर्षी चांगले पीक हातात यावे अशी त्यांची अपेक्षा असते .परंतु कधी कधी निर्सग त्यांना साथ देत नाही .त्यातच हातात येणारे पीक समाधान कारक नसते .शेतीचा हंगाम चंद्रपूर जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात सध्या सुरु झाला असुन शेतकरी वर्ग कामात गुंतला असल्याचे चित्र काेरपना तालुक्यातील पिपरी गावांसह इत्तर भागात आज दिसून आले .आता त्यांना मान्सुनची प्रतिक्षा आहे .