शेतकऱ्यांच्या जनावराची चोरी
विरेंद्र पुणेकर
राजुरा: १३ मार्च काढोली । चोरट्यांनी रात्रीतून सुमारे ११ च्या दरम्यान जनावरे चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या चोरीची नोंद सास्ती व राजुरा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
शेतांमधून बापूजी पुंजाराम हिंगाने यांची बैलजोडी शनिवारी रात्री ११ च्या सुमारे चोरीला गेली. हे शेतकरी सकाळी बैलांना चारापाणी करण्यासाठी गेल्यानंतर चोरी उघडकीस आली. काढोली येथील बापूजी हिंगाने या शेतकऱ्यांचे दोन बैल चोरीस गेले. ही घटना शनिवार रात्री घडली. बैल चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रात्रोच्या अंधाराचा फायदा घेऊन जनावरे कत्तलखान्यात नेणारी टोळी सक्रिय झाल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.